शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विमा कंपन्यांच्या मनमानीला बसणार आता चाप; नुकसानीच्या प्रस्तावासाठी असणार सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 5:00 AM

पाऊस कमी झाला की पिकांचे उत्पादन कमी होत असते, तर कधी अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात वाहून जात असतात. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. याची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ मध्ये पीक विमा योजना अंमलात आणली होती, पण या योजनेचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नव्हता. यातील जाचक अटींमुळे बरेच लाभार्थी शेतकरी वंचित राहत होते. कंपन्या मात्र मालामाल होत असल्याचे सांगण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईलवर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे विमा कंपन्याच्या मनमानीला ब्रेक लागणार व शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल.शेतकरी मोठ्या मेहनतीने आपली शेती पिकवित असतो, परंतु निसर्गाच्या अनिश्चितीमुळे आणि लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. पाऊस कमी झाला की पिकांचे उत्पादन कमी होत असते, तर कधी अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात वाहून जात असतात. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. याची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ मध्ये पीक विमा योजना अंमलात आणली होती, पण या योजनेचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नव्हता. यातील जाचक अटींमुळे बरेच लाभार्थी शेतकरी वंचित राहत होते. कंपन्या मात्र मालामाल होत असल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सहज घेता, यावा यासाठी ही जाचक अट वगळण्यात आली आहे.

आधी काय होते दोन पर्याय

विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्या पासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक राहील.

विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्या पासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक राहील.

हे आहेत नवीन पर्यायnक्रॉप इन्शुरन्स ॲपबरोबरच आता नुकसानग्रस्त शेतकरी, या नवीन पर्यायानुसार माहिती देऊ शकतील विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, त्यांचा ई-मेल, त्यांचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला. त्या बँकेची नजीकची शाखा या ठिकाणीही शेतकरी आता त्यांच्या शेतीची नुकसानीची सूचना नोंदवू शकेल.

दहा कोटींचे नुकसान- देवळी, आर्वी, सेलू या तीन तालुक्यांत अतिवृष्टीची कृषी विभागाकडून नोंद घेण्यात आली. शेतकऱ्यांचे कोटींचे नुकसान झाले. यंत्रणा पंचनामे करतात. सादरही करतात, तरीही शेतकरी लाभापासून वंचितच राहतो.

 

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा