शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणात अडकला उड्डाणपूल

By admin | Updated: May 11, 2017 00:36 IST

वाहतुकीची कोंडी सोडविण्यात रेल्वे उड्डाण पुलाची भूमिका महत्त्वाची आहे. या दृष्टीने सर्वंकष प्रयत्नांनी पुलाच्या रूंदीकरणास मंजुरी मिळाली.

४५ कोटींचा निधी मंजूर : विकास कामामध्ये होतेय राजकारण प्रशांत हेलोंडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाहतुकीची कोंडी सोडविण्यात रेल्वे उड्डाण पुलाची भूमिका महत्त्वाची आहे. या दृष्टीने सर्वंकष प्रयत्नांनी पुलाच्या रूंदीकरणास मंजुरी मिळाली. निधीही प्राप्त झाला; पण अतिक्रमण, पुनर्वसन, विद्युत लाईनचा प्रश्न खितपत आहे. शिवाय राजकारण आड येत असल्याने दीड महिन्यांपासून उड्डाण पुलाचे काम रेंगाळले आहे. आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरण कामासाठी ४५ कोटी रुपये मंजूर आहेत. यातील २४ कोटी रुपये पूल व रस्ता बांधकामावर खर्च होणार आहे. उर्वरित रक्कम महावितरण, पारेषण, नगर पालिका तथा बांधकाम विभागाच्या कार्यकक्षेतील कामांसाठी राहणार आहे. महावितरणकडून २ कोटी २७ लाख रुपयांची कामे केली जात आहेत. ही कामे प्रगतिपथावर असली तरी नगर पालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. पालिकेला उड्डाणपूल परिसरात असलेले अतिक्रमण हटविण्याबाबत पत्र देण्यात आले आहे; पण त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर येत असल्याने अतिक्रमण कायम आहे. परिणामी, पुलाचे कामही रेंगाळले आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या बोरगावकडील बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. शिवाय देवळीकडील मार्गावरही अतिक्रमण आहे. हे दोन्ही ठिकाणचे अतिक्रमण हटविणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय रूंदीकरण कक्षेत पाईपलाईन आहे. सदर पाईपलाईन हटविणेही गरजेचे आहे. यासाठी पालिकेने अद्याप पुढाकार घेतला नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय अतिक्रमण धारकांबाबत राजकारण होत असल्याने पुलाचे काम रखडत असल्याचा आरोपही होत आहे. महत् प्रयासाने मंजूर झालेला रेल्वे उड्डाणपूल स्थानिक राजकारणामुळे रखडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महावितरणकडून २.२७ कोटींची कामे सुरू विद्युत वायर बदलणे, खांब व सर्व्हीस केबल अन्यत्र हलविणे आदी कामे महावितरणद्वारे सुरू आहे. पुलाच्या रूंदीकरण हद्दीत तीन फीडर येतात. यातील दोन-दोन केबल बदलण्याची ४.७ किमीमधील कामे सुरू आहे. देवळी मार्गावर अर्धा किमी अंतरावरील विद्युत खांब हलविणे, तारा जोडणे ही कामे सुरू आहे. दोन खांबांचा वाद असल्याने विलंब होत असून एक-दोन दिवसांत ते पूर्ण होणार आहे. वायगाव रोडवरील ४०० मिटर खांब बदलणे व तारा टाकण्याचे काम पूर्ण झाले. उड्डाण पुलाजवळील ओव्हर हेड केबलचे काम प्रलंबित आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळताच ते काम पूर्णत्वास नेले जाणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. अधिकारी, पदाधिकाऱ्यांची चुप्पी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाबाबत अधिकारी, पदाधिकारी चुप्पी साधून असल्याचेच दिसून आले. नगराध्यक्षांनी दुसऱ्या कामात असल्याचे सांगितले तर न.प. मुख्याधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी सुटी असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचे सांगितले. केवळ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे सोपविलेली कामे पूर्णत्वास नेत असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या.