शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचायती ब्रॉडब्रँडने जोडणार

By admin | Updated: September 11, 2014 23:44 IST

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ येत असताना ग्रामपंचायती यात मागे राहू नये, बदलत्या जगाचा वेध घेता यावा तसेच माहिती तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेत काम अधिक गतीमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करता यावे

राज्यात २८ हजार ग्रामपंचायती : नागरिकांना होणार सुविधाप्रफुल्ल लुंगे - सेलूतंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ येत असताना ग्रामपंचायती यात मागे राहू नये, बदलत्या जगाचा वेध घेता यावा तसेच माहिती तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेत काम अधिक गतीमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करता यावे या उदात्त हेतूने आगामी काळात देशातील ग्रामपंचायती, आॅप्टिकल फायबर नेटवर्कने, ब्रॉडबॅँड इंटरनेट कनेक्शनद्वारे जोडण्यात येणार आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना त्यामुळे उच्च क्षमतेची आणि उच्च दर्जाची ब्रॉँडबॅँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे. यात जिल्ह्यातील ५१७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या आधुनिक सुविधेमुळे राज्यात सुरू असलेल्या ई-गव्हर्नन्स आणि ई-पंचायत (संग्राम) या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस गती येणार आहे. केंद्र सरकारने नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी केंद्राने भारत ब्रॉडबॅँड नेटवर्क लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. या अंतर्गत देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये ही ब्रॉडबॅँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेला राष्ट्रीय संपत्ती म्हणूनही जाहीर करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि भारत ब्रॉडबॅँड नेटवर्क लिमीटेड यांच्यात गत वर्षी त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. ई-पंचायत कार्यक्रमांतर्गत राज्यात संग्राम अर्थात संगणीकृत ग्रामीण महाराष्ट्र या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद सर्व पंचायत समिती आणि जवळपास २८ हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या आहेत. यापैकी २० हजार गावांमध्ये ई-बॅँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून अशी सेवा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.या आधुनिक प्रणालीमुळे गावखेडेही आता हायटेक होणार असल्याने महात्मा गांधीच्या स्वप्नातील खेड्यांचे चित्र निर्माण होत असल्याचा प्रत्यय येवू लागला आहे. ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा सुरू झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.