शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

१५ धरणांत १८ टक्केच जलसाठा

By admin | Updated: May 24, 2015 02:23 IST

जिल्ह्याचा पारा ४७ अंशावर स्थिरावत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.

वर्धा : जिल्ह्याचा पारा ४७ अंशावर स्थिरावत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. या वाढत्या तापमानाचा फटका जलाशयांनाही बसत असून त्यांची पातळी कमालीची घसरत आहे. जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या १५ जलाशयांची टक्केवारी दिवसेंदिवस खालावत आहे. या जलाशयात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाणी टंचाईचे चित्र जिल्ह्यात आणखी भीषण रूप धारण करण्याचे संकेत मिळत आहे.जिल्ह्यात असलेल्या १५ प्रकल्पांपैकी १४ प्रकल्पात वापरण्यायोग्य जलसाठा असला तरी नांद प्रकल्पात मात्र कोरड पडली आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील लघू प्रकल्पाची झाली आहे. एकूण असलेल्या २० लघू प्रकल्प कोरडे पडले असल्याने रानात भटकंती करणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. पारा कमी जास्त होत असल्याने बऱ्यास पकल्पातील जलस्तर घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात लालनाला व पोथरा ही दोन जलसाठे कोरडी पडण्याच्या जवळ आल्याचे त्यांच्यात असलेल्या पाण्याच्या टक्केवारीवरून दिसत आहे. इतर जलाशयाचीही हीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे. धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरवठा होत आहे. या धरणात जलसाठा असल्याने शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही.(प्रतिनिधी)