शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

चूल कशी  पेटवतात ? -माहितीये  का ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 4:04 PM

तुम्ही खेड्यात राहणारी मुलं असाल, तर तुम्हाला हे वाचून मजा वाटेल. पण तुम्हाला माहितीये का, की शहरात राहणार्या मुलांनी ही चूल कधी बघीतलेलीच नसते!

ठळक मुद्दे .. आज पेटवा चूल!

मान्य आहे की बाहेर भयंकर ऊन आहे. हेही खरंय की सॉलिड उकडतंय. पण तरी बहुतेक ठिकाणी रात्री तर मस्त गार होतं. खरं म्हणजे संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की वारं सुटतं आणि मग दिवसभराचा उकाडा आणि तगमग जरा कमी होते. अशी वेळ झाली की आपण जायचं थेट अंगणात नाही तर गच्चीत. तीन विटा गोळा करायच्या, लाकडं गोळा करायची, लाकडाचा भुसा किंवा बारीक काड्या गोळा करायच्या, ज्यातून हवा घालता येईल अशी फुंकणी शोधायची, ही फुंकणी शक्यतो धातूची शोधायची, घरात रॉकेल असेल तर ते थोडं मागायचं, काड्यापेटी घ्यायची..  एवढी तयारी तुम्ही केलीत की तुमचा नेमका काय उद्योग चाललाय यावर लक्ष ठेवायला एक तरी मोठा माणूस येईलच. त्यांना येऊ दे. आपल्याला त्यांची मदत लागणार आहे. आणि जर कोणी मोठं आपणहून आलं नाही तर आपण जायचं आणि एखाद्या मोठ्या माणसाला बोलावून आणायचं. कारण आपल्याला पेटवायची आहे, चूल!तीच तीच. शहरातली मुलं फक्त मराठीच्या पुस्तकात वाचतात ती चूल. ती कशी मांडायची आणि कशी पेटवायची याचं तंत्र असतं. ते मोठ्या माणसांना माहिती असतं. खाली जाड लाकडं रचायची, त्यावर बारीक काड्या रचायच्या आणि त्यावर कोळसा ठेवायचा. या सगळ्याला थोडं रॉकेल शिंपडायचं म्हणजे चूल लौकर पेटते. मग काड्यापेटीने पेपरची गुंडाळी आणि पेपरने चूल पेटवायची. पहिला जाळ आणि धूर होऊन गेला की मग त्यात फक्त निखारे धगधगत राहतात. तोवर थांबायचं. घाई करायची नाही. आणि एकदा का ते नुसते निखारे पेटते राहिले की त्यात कांदे, बटाट्याच्या चकत्या, वांगी, खोब?्याच्या वाट्या, मक्याचं कणीस असले पदार्थ भाजायला ठेवायचे. आणि मग, सुमारे अध्र्या तासाने खरपूस भाजले गेलेले ते पदार्थ, तिथेच बसून, त्याच्यावरची काजळी झटकून तिखट मीठ लावून खाऊन टाकायचे.फक्त हे सगळं सुरु करण्याच्या पूर्वी शेजारी पाण्याच्या दोन मोठ्या बदल्या भरून ठेवायला विसरायचं नाही आणि सगळं खाऊन झाल्याच्या नंतर चुलीतली धग पूर्ण गेल्याशिवाय तिथून हलायचं नाही. कारण मजा करायची, पण सुरक्षित राहून!- आता तुम्ही जर का खेड्यात राहणारी मुलं असाल, तर तुम्हाला हे वाचून मजा वाटेल. पण तुम्हाला माहितीये का, की शहरात राहणार्या मुलांनी ही चूल कधी बघीतलेलीच नसते!