राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Group Jayant Patil News: रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्यात यावी. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी करताच जयंत पाटील आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे. ...
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्याबद्दलचा एक प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पत्रकारालाच उलट सवाल केला. अजित पवारांचे उत्तर ऐकून उपस्थितांना हसू अनावर झाले. ...