लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणा-यांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत. ...
तालुक्यातील मोरवड येथील जलमित्र व ग्रामस्थांनी गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. त्याबद्दल जलमित्रांचा ३१ मार्च रोजी डॉ. सतीश पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
परभणी- हिंगोली मार्गावरील जवळा बाजार परिसरात सतरा मैल येथे ट्रक्टर व दुचाकीची समोरा- समोर धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
नगरपालिका निवडणुकीच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेला २५ कोटींचा निधी आश्वासनातच विरतो की काय? अशी चर्चा होत होती. मात्र मार्चअखेर २३.८0 कोटी रुपयांचे आदेश निघाले आहेत. अर्थमंत्र्यांनी आश्वासन पाळले असून शहर विकासाला गती मिळेल, ...
नगरपालिका व महावितरणमध्ये पथदिव्यांच्या देयकावरून चांगलीच जुंपली आहे. १.0३ कोटींचा वीज बिल भरणा करूनही महावितरण केवळ २५ लाख रूपये भरल्याचे सांगत आहे. त्यामुळे शहरात अंधार पसरत असून एखादा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणला जबाबदार धरुन फौजदारी का करू नय ...
येथील कोषागार कार्यालयात बिले सादर करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकच घाई करीत होते. शेवटच्या दिवशी होणारी घाई थांबविण्यासाठी १४ मार्च रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार २३ मार्चपर्यंत सर्वच विभागाची बिले मागितली होती. त्यामुळे वर्षाच्या श ...
अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली होती. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर कोणीच गुरे सांभाळण्यास तयार नसल्याने शेवटी गुन्ह्यांचा तपास सोडून गुरांचा एखाद्या ध ...
वसमत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला लागलेली गळती थांबवण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. पाईपलाईन दुरूस्तीच्या कामामुळे शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. ...