शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 03:56 IST

दहा ते बारा तास काळोख; विद्यार्थ्यांना मेणबत्तीचा आधार, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

पालघर : जिल्ह्यात १० ते १२ तासाचे भारनियमन लादण्यात आल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असून एन परिक्षामध्ये विद्यार्थ्यांवर दिवा लावून अभ्यास करण्याची वेळ आली आहे. हे भारिनयमन रद्द करण्यासाठी सत्ताधारी आमदारानाच आपल्या सरकारविरोधात उपोषणाला बसण्याची वेळ आल्याची टीका शुक्रवारी विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी केली आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.
जिल्ह्यातील वाढते भारनियमन आणि अन्य वीज समस्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित,जिप अध्यक्ष विजय खरपडे,आमदार अमति घोडा, जिल्हाधिकारीडॉ.प्रशांत नारनवरे, मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, विद्युत वितरण च्या अधीक्षक अभियंत्या किरण नगावकर, निलेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ष १९७४ पासून वसई ते झाई-बोर्डी या किनारपटटीभागासह दगडधोंड आदी ग्रामीण भागात भागात बसविण्यात आलेले विद्युत खांब, तारा जीर्ण झाल्याने अनेक वेळा अपघात होत विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नवीन खांब, तारा बद्लण्याबाबत कार्यवाही व्हावी असे खासदार गावित यांनी सांगितले. त्यावर सदर भागाचे सर्वेक्षण करण्यात यावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना सांगितले.
सर्व तालुक्यात १० ते १२ तासांचे भारनियमन रद्द करण्या बरोबरच मीटर रिडींगसाठी नेमलेल्या एजन्सीकडून दोन दोन वर्षे रीडिंगच घेतली जात नसल्याचा आरोप जिप अध्यक्ष खरपडे यांनी केला.

महावितरणला प्रस्ताव सादर करण्याचे सवरांचे निर्देश
सागरी किनारा तसेच जुलै महिन्यात उद्भवलेली पूर परिस्थिती यामुळे विजेचे खांब, तारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी फिडर, सबस्टेशन यांची उंची वाढविणे आवश्यक आहे.
अर्नाळा भागात नवीन सबस्टेशन उभारणे, जव्हार-डहाणू या भागात नवीन लाईन उभारणे आदी मागण्या यावेळी महावितरणने केल्या. यावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :electricityवीजpalgharपालघर