शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या भाजी मंडयांना लागली घरघर

By admin | Updated: January 2, 2017 03:50 IST

निवडणुका तोंडावर आल्याने उल्हासनगर स्मार्ट करण्याचे स्वप्न दाखवण्याच्या, विकासाचे पॅकेज देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.

निवडणुका तोंडावर आल्याने उल्हासनगर स्मार्ट करण्याचे स्वप्न दाखवण्याच्या, विकासाचे पॅकेज देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात तशी आश्वासने दिली जातीलही. पण अस्तित्वात असलेल्या सुविधांकडे प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर त्यांची कशी दुरवस्था होते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे उल्हासनगरच्या भाजी मंडया. पालिका पथकांचे दुर्लक्ष, विक्रेत्यांनी फिरवलेली पाठ यामुळे या मंडया ओसाड पडल्या आहेत. त्यांच्या अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. 'उल्हासनगर महापालिकेने १९९० ते ९५ दरम्यान कॅम्पनुसार भाजी मंडया बांधल्या. सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात आणि सोयीच्या ठिकाणी भाजी मिळावी, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील सर्व मंडया अखेरच्या घटका मोजत आहेत. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या इमारती आज धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी भाजीविक्रेते बसण्यास धजत नाहीत. आज या भाजी मंडयांसमोरच भाजीपाल्याच्या बेकायदा गाड्या उभ्या राहत आहेत. यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मार्केटची भाडेवसुली पालिकेऐवजी गावगुंड करीत आहेत. या मंडयांमध्ये साफसफाईच केली जात नसल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. उघड्यावर फेकलेला भाजीपाल्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या इमारतींची पालिकेने दुरुस्तीच केली नसल्याने त्या धोकादायक अवस्थेत आल्या आहेत. त्या केव्हाही कोसळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुरवस्थेमुळे इमारतींना गळती लागली आहे. अतिधोकादायक झालेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेवर अंबरनाथ-कल्याण रस्ता रुंदीकरणातील बाधित व्यापाऱ्यांना गाळे बांधून देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजी मंडईचे अस्तित्वच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कॅम्प नं.-३ येथील एकेकाळचे सुसज्ज इंदिरा गांधी भाजी व मटण मार्केट अतिधोकादायक झाले आहे. मंडईला चारही बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा पडूनही कारवाई झालेली नाही. मटण मार्केटचीही दुरवस्था झाली आहे. तसेच उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ बांधलेले मच्छी मार्केट १५ वर्षांपासून वापराविना पडून आहे. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी त्या जागी सुसज्ज मार्केट बांधण्याची संकल्पना मांडली होती. पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनीही या मार्केटची पाहणी करून त्याजागी नवे मार्केट बांधण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मासेविक्रेते रस्त्यावरच बसून व्यवसाय करत असल्याने रेल्वे स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे.