शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीसाठी पालिकेकडे पर्यायी व्यवस्था नाही

By admin | Updated: February 4, 2016 02:31 IST

शहराला स्टेमच्या पाणीकपातीतून वगळल्यामुळे पाण्याची पातळी खालावल्याची बोंब उठल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने शहरालाही पुनश्च कपात लागू केली आहे

राजू काळे,  भार्इंदरशहराला स्टेमच्या पाणीकपातीतून वगळल्यामुळे पाण्याची पातळी खालावल्याची बोंब उठल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने शहरालाही पुनश्च कपात लागू केली आहे. या कपातीदरम्यान पालिकेकडे पाणीपुरवठ्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. मात्र, ज्यांना टँकरचे पाणी मंजूर झाले आहे, त्यांच्याखेरीज इतरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शहराला स्वत:चा पाण्याचा स्रोत नसल्याने केवळ शासकीय कोट्यावर अवलंबून राहावे लागते. स्टेम व एमआयडीसीकडून एकूण १३६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत असला तरी तो लोकसंख्येला अपुरा आहे. पाणीपुरवठ्याच्या ठिकाणाहून शहर सुमारे ४५ किमी अंतरावर शेवटच्या टोकाला असल्याने दोन पाणीपुरवठ्यातील अंतर ५० ते ७० तासांवर जात आहे. यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणच्या रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. स्टेमच्या शिथिल कपातीसह एमआयडीसीची बुधवार व गुरुवारऐवजी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी, रविवारी कपात लागू झाली.उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा सलग दोन दिवस बंद राहणार असून पालिकेने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था केली नसल्याने हाहाकार उडण्याची शक्यता शहरात निर्माण झाली आहे. हातपंप व विंधन विहिरी दुरुस्त करण्याचे काम कागदावर असून सेना नगरसेवक रमेश चव्हाण, सुभाष मनसुलकर, राजश्री चौधरी आदी नगरसेवकांनी स्वत: पदरमोड करून प्रभागातील नागरिकांसाठी बोअरवेल खोदल्या आहेत.उल्हासनगर महापालिका पाण्यासाठी संपूर्णत: एमआयडीसीवर अवलंबून आहे. शहराला दररोज ११५ ते १२० एमएलडी पाणीपुरवठा होत असून पूर्वेला पाले व जांभूळ गावच्या जलकुंभांतून ३८ तर पश्चिम भागाला शहाड जलकुंभातून ७८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. पाटबंधारे विभागाने ३० टक्के पाणीकपात करताच तीव्र पाणीटंचाई शहरात निर्माण झाली असून वेळीच पर्यायी व्यवस्था पालिकेने केली नाही. यापूर्वी पूर्व भागात गुरुवारी व शुक्रवारी असे सलग दोन दिवस तर पश्चिमेला मंगळवार व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद केला जात होता. आता शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस पाणी बंद राहणार असल्याचे प्रसिद्धिपत्रक पालिकेने काढल्याची माहिती कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली.च्शहरातील कंवाराम चौक, ओटी सेक्शन, सुभाष टेकडी परिसर, नागसेननगर, दहाचाळ, महात्मा फुले कॉलनी, संतोषनगर, भीमनगर, मद्रासीपाडा, तानाजीनगर, भय्यासाहेब आंबेडकरनगर, रमाबाई आंबेडकरनगर, प्रेमनगर टेकडी परिसर, संभाजी चौक आदी परिसरांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.च्या विभागातून शेकडो नागरिक दररोज पालिकेवर धडकून पाणीपुरवठ्याची मागणी करीत आहेत.च् सोमवार, मंगळवारी नागरिकांनी पालिकेवर मोर्चा आणला होता. पाणीपुरवठा अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी मोर्चा व आंदोलनाचा धसका घेतल्याने मोबाइल बंद करून ठेवले आहेत.नियोजन सोमवारच्या पाणीपुरवठ्याचेच्सलग दोन दिवस पाणी नसल्याने नागरिकांना तिसऱ्या दिवशी पाणी देणे बंधनकारक असल्याने सोमवारच्या पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. एकाच दिवशी संपूर्ण शहराला मुबलक पाणी देणे गरजेचे असल्याने सोमवारचा पाणीपुरवठा कसा करायचा आणि त्यासाठी काय करता येईल, याचे नियोजन आखण्यात येत आहे. च्दोन दिवस पाणी नसल्याने साहजिकच नागरिक सोमवारी पाण्याची वाट पाहणार आहे. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातही वाढीव १० टक्के पाणीकपातीचा भारही उर्वरित पाच दिवसांमध्ये वर्ग केल्याने नियमित पाण्यापेक्षा कमी पाणी शहरात येईल. च्टँकरचालकांनाही जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करणार नाही. त्यामुळे टँकरचालकांचेही हाल होणार आहेत. टँकरवर अवलंबून दुर्गम भागांसाठीच पाणी दिले जाणार आहे. मात्र, जेथे नळाद्वारे पाणी येते, तेथे टँकरने पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे दर शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्र वार, दिनांक ५ फेब्रुवारीला रात्री १२ ते शनिवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून या कालावधीत इंदिरानगर, गांधीनगर, श्रीनगर, समतानगर, टेकडी बंगला, घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.शुक्र वार, दिनांक ५ फेब्रुवारीला रात्री १२ ते रविवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत जेल, ऋ तुपार्क, सिद्धेश्वर, उथळसर, साकेत, महागिरी, नौपाडा, पाचपाखाडी व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहणार आहे. एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार ते रविवार या कालावधीत बंद राहणार आहे. त्यानुसार कळवा, मुंब्रा भागांचा पाणीपुरवठा यापुढे शुक्रवार ते रविवारपर्यंत ४८ तास बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर मधील रूपादेवीपाडा व वागळे फायर ब्रिगेड या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहणार आहे.लाखांच्यावर बदलापूर शहराची लोकसंख्या असून या शहरासाठी दररोज ४७ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. तर, अंबरनाथ शहराची लोकसंख्या २.७५ लाख असून या शहरासाठी ५५ दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याची गरज आहे. या दोन्ही शहरांना जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करत आहे. उल्हास नदीपात्रातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यावर ४० टक्के कपात लागू केल्याने पाण्याचे वितरण करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.