शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
4
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
5
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
6
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
7
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
8
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
9
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
10
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
11
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
12
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
13
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
14
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
15
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
16
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
17
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
18
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
19
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
20
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ मलंगगडाच्या डोंगर रांगेतील तावली डोंगर खचतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 20:43 IST

मलंग गडाचा डोंगर रांगेतील उंच हा डोंगर असून त्या डोंगराला सध्या तडा गेला आहे. 

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातला तीन टोकांचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेला तावलीचा डोंगर खचायला सुरुवात झाली आहे. या डोंगराचं एक टोक ढासळलं असून यामुळे मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे, मोठमोठे खडक खाली आले आहेत. डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतच्या भागातून हा तीन टोकांचा तावलीचा डोंगर दिसतो. मलंग गडाचा डोंगर रांगेतील उंच हा डोंगर असून त्या डोंगराला सध्या तडा गेला आहे. 

या तीन टोकांपैकी मधल्या टोकावर काही दिवसांपूर्वी वीज कोसळली, आणि तेव्हापासून हा भाग खचायला सुरुवात झाली. सध्या या डोंगराचा लक्षणीय भाग ढासळला असून मधल्या भागात एक मोठा पट्टा तयार झाला आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात दगड, धोंडे, मोठे खडक सातत्याने खाली येत आहेत. या डोंगरातून उगम पावणारा ओढा हा अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचा प्रमुख जलस्रोत आहे. मात्र सध्या हा ओढा सुद्धा बुजण्याच्या मार्गावर आहे. 

शिवाय, हेच दगडधोंडे चिखलोली धरणाच्या पात्रात जात असल्यानं चिखलोली धरणाच्या भिंतीवर दाब वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. मात्र असं असलं, तरी महसूल विभाग, वनविभाग, लघुपाटबंधारे विभाग यापैकी कुणीही अद्याप याकडे लक्ष दिलेलं नाही. अंबरनाथमधील निसर्गमित्र सुधाकर झोरे हे यासाठी पाठपुरावा करतायत. शिवाय स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनीही याबाबत पत्रव्यवहार केलाय. मात्र तरीही अजून तरी शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही आहे.

टॅग्स :thaneठाणे