उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे कलिंगड आता घातक ठरू लागले आहे. मुंबईतील घटनेनंतर आता बिहारमधील बक्सर जिल्ह्यात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ८ जणांची प्रकृती अचानक खालावल्याची घटना घडली आहे. येथील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनवर्षा गावात ही घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात, सदर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला तत्काळ 'हायर सेंटर'मध्ये हलवण्यात आले आहे. तर इतर ७ जणांवर स्थानिक रुग्णालयातच उपचार करण्यात आले. यांपैकी ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोन जणांवर उपचास सुरू आहे. लीलावती देवी आणि त्यांची मुलगी गीता देवी अशी उपचास सुरू असलेल्या रुग्णांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने दुपारच्या वेळी बाजारातून आणलेले कलिंगड खाल्ले. यानंतर काही तासांतच लहान मुलांसह घरातील सर्वांना उलट्या, जुलाब, पोटदुखी सुरू झाली आणि अस्वस्थही वाटू लागले. परिस्थिती अधिक बिघडू लागल्यानंतर, शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची गंभीर दखल घेत सिव्हिल सर्जन डॉ. शिवकुमार प्रसाद चक्रवर्ती यांनी अन्न निरीक्षकांना (Food Inspector) या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. कलिंगड लवकर पिकवण्यासाठी किंवा ते अधिक लाल दिसण्यासाठी वापरले जाणारे नायट्रेट, कृत्रिम रंग (एरिथ्रोसिन) अथवा कार्बाइड यांसारख्या रसायनांमुळे ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. महत्वाचे म्हणजे, उन्हात ठेवलेल्या किंवा खूप वेळ कापून ठेवलेल्या फळांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Web Summary : Eight family members in Buxar, Bihar, suffered poisoning after eating watermelon. They experienced vomiting, diarrhea, and stomach pain. Doctors suspect chemical contamination. An investigation is underway, and health officials are urging caution.
Web Summary : बिहार के बक्सर में तरबूज खाने से एक ही परिवार के आठ सदस्य बीमार हो गए। उल्टी, दस्त और पेट दर्द की शिकायत हुई। डॉक्टरों को रासायनिक संदूषण का संदेह है। जांच जारी, स्वास्थ्य विभाग सतर्क।