शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

By जितेंद्र कालेकर | Published: October 28, 2022 2:14 PM

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियान चे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियान चे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे शुक्रवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी प्रा. नीता व मुलगा निमिष  असा परिवार आहे.

संजीव साने साथी मधु लिमये जन्मशताब्दी समारोह समितीचे निमंत्रक होते.  त्यांनी आणीबाणी विरोधी कार्यापासून सामाजिक , राजकीय कामाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रसेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले,ते समता आंदोलन, समाजवादी जनपरिषदचे संस्थापक सदस्य व पूर्णवेळ कार्यकर्ते होते.ते एन्रॉन विरोधी कृती समितीचे सह निमंत्रक व रायगड मधील सेझ आंदोलनाचे सह निमंत्रक होते.जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात ते स्मृतीशेष ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात एन.डी. सरांच्या सोबत निमंत्रक म्हणून काम केले आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे विश्वस्त होते. त्यांचा विचारवेध संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. वडघर ( माणगाव) येथे झालेल्या तेराव्या विचारवेध संमेलनाचे ते संयोजक होते.  त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त आणि कार्याध्यक्ष म्हणून काम केले होते.

वर्ल्ड सोशल फोरम या मुंबईतील कार्यक्रमाचे संयोजक, ठाण्यातील मतदार जागरण अभियानाचे सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांनी स्वराज्य इंडिया अभियानतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांतील कॉलेजमध्ये 'बळीराजांची मुले मुली' हा कार्यक्रम घेऊन प्रबोधनाचेही त्यांनी काम केले. 

ते ठाणे येथील वी नीड यू सोसायटीचे सदस्य व कार्याध्यक्ष होते. त्यांनी संस्थेतर्फे पैसे गोळा करून कोरोना काळात कष्टकरी असंघटित वर्गातील सातशे लोकांना एकंदर सहा महिने दररोज जेवण दिले.त्यांनी कोरोना काळात पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी मानधन गोळा करून अर्थसाह्य प्रकल्पही सुरू केला होता. 

त्यांनी चळवळी आणि आंदोलनाच्या निमित्ताने विविध पुस्तकांचे लिखाणतसेच वर्तमानपत्रात सदर लेखन केले आहे. त्यांनी सेवाग्राम कलेक्टिव्ह तर्फे महाराष्ट्रातील पूर्णवेळ शंभर सामाजिक कार्यकर्यांना गांधींजीं विषयी तीन खंड व डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांचे मुलांसाठी विवेकानंद आदी विचार प्रवर्तक पुस्तकांच्या प्रती पाठवण्यात पुढाकार घेतला होता. संजीव साने यांनी डॉ. यशवंत सुमंत यांच्यासोबत पुणे येथील  महात्मा फुले वाडा ते गांधींचा वर्ध्याचा आश्रम ' महात्मा ते महात्मा' या ऐतिहासिक पदयात्रेचे  संयोजनात सहभाग घेतला होता. 

संजीव साने यांनी रेमिंग्टन या टाईपरायटर कंपनीत नोकरी केली. मालकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर आम्ही कर्मचारी कंपनी चालवू असा प्रस्ताव देऊन काही काळ कंपनी चालविली. त्यानंतर नवीन तंत्रज्ञान आल्याने ही कंपनी बंद झाली. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ सामाजिक, राजकीय कार्यात झोकून दिले. त्यांनी आप पार्टीच्या वतीने ठाणे लोकसभा निवडणूक लढवली होती. साने यांना वर्धा येथील दाते संस्थेचे वतीने डॉ.भा.ल. भोळे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार तसेच निळू फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे