शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी रोखले रस्ता रुंदीकरण!

By admin | Updated: January 9, 2016 02:10 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून घेतल्याने थांबवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा सुरु असून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ही कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.स्मार्ट सिटी प्रकल्पात कल्याण रेल्वे स्थानक परिसराच्या रुंदीकरणाला व विकासाला आयुक्त ई रवींद्रन यांनी विशेष प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराकडे जाणारा शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यास शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ झाला. कडक पोलीस बंदोबस्त याकरिता तैनात केला होता. कारण या कारवाईला व्यापाऱ्यांनी सक्त विरोध केला होता. व्यापाऱ्यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता धावून आले होते व त्यांनी अशी कारवाई होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र अचानक दुपारनंतर पोलीस बंदोबस्त काढून घेतला गेला व कारवाई थांबली. कारवाई थांबली असली तरी ८० टक्के पाडकाम झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला तर व्यापाऱ्यांनी स्वत:हून काही बांधकाम पाडण्याची तयारी दाखवल्याने कारवाई थांबली, असा दावा व्यापाऱ्यांनी केला.इमारती, दुकाने अशा ३१२ जणांना त्यांचे बांधकाम पाडून टाकण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यात मोठया प्रमाणावर व्यापाऱ्यांची बांधकामे होती. त्यांनी हे रूंदीकरण थांबावे म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न करून पाहिले. कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवली आणि निषेध प्रकट केला. त्याचवेळी मंत्री मेहता हे व्यापाऱ्यांना भेट द्यायला आले. स्मार्ट सिटी लोकांकरिता आहे की, अधिकाऱ्यांकरिता असा सवाल मेहता यांनी करीत. कारवाई होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.आयुक्त रवींद्रन हे कारवाईवर ठाम होते. त्यांनी दबावाला बळी न पडता शुक्रवारी सकाळपासूनच ४ जेसीबी, ३ पोकलेन, २०० पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी, आठ प्रभागक्षेत्र अधिकारी असा मोठा फौजफाटा कारवाईसाठी तैनात केला होता. व्यापाऱ्यांनी हस्तक्षेप करु नये याकरिता शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही कारवाई होणारच हे स्पष्ट झाल्याने काही व्यापाऱ्यांनी गुरूवारी रात्रीपासूनच आपली वाढीव बांधकामे स्वत:हून पाडण्यास सुरूवात केली होती. आम्हाला रुंद रस्ते हवे अशी भूमिका पादचारी व वाहन चालक यांनी घेत आयुक्तांच्या या कारवाईचे कौतुक केले. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास कारवाई थांबविण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातून आयुक्त रवींद्रन यांना दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा आहे. नगरविकास व गृह ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांच्या कार्यालयाखेरीज हे घडले नाही, असे बोलले जाते. प्रकाश मेहता यांनी कल्याणमधील कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने ती थांबली, असेही बोलले जाते.