शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेच्या श्रेयासाठी राजकीय नेत्यात जुंपली

By admin | Updated: February 2, 2016 01:51 IST

महापालिका मालमत्ता कर विभागाने थकित मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. स्थायी समितीने अभय योजनेला घाईघाईत मंजूरी देत कारवाईत खोडा केला आहे.

उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर विभागाने थकित मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. स्थायी समितीने अभय योजनेला घाईघाईत मंजूरी देत कारवाईत खोडा केला आहे. मात्र योजने बाबतचे सर्वाधिकार आयुक्तांकडे असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत जप्तीची कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहेत. उल्हासनगर पालिका मालमत्ता कर विभागाची थकबाकी ३०० कोटीवर गेली आहे. विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी ५ आणि १ लाखांहून जास्त थकबाकीधारकांच्या याद्या तयार करून ६० हजार नोटीसा काढल्या आहे. नोटीसी नंतर मालमत्ता कर न भरणा-याच्या मालमत्तेवर जप्ती कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने धनदांडग्याच्या मनात गोळा उठला असून स्थायी समितीने घाईत अभय योजनेला मंजूरी देवून कारवाईत खोडा टाकला आहे.मालमत्ता कर विभागाने गेल्या आठ दिवसात १५ मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली असून ४० लाखाची थकबाकी बसूल झाल्याची माहिती उपायुक्त लेंगरेकर यांनी दिली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यांन पालिकेने अभय योजना सुरू केली होती. सुरवातीला थंड प्रतिसाद मिळाल्याने योजनेवर प्रश्नचिन्हे निर्माण झाले होते. योजना गुंडाळावी की काय? अशी परिस्थितीत निर्माण झाली होती. मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागरिकांनी कर बिले भरण्यासाठी एकच गर्दी केली.उपायुक्त लेंगरेकर यांनी पोलिस संरक्षणात थकबाकीधारकाच्या मालमत्तेची जप्ती सुरू करताच शहरभर पडसाद उमटले. राष्ट्वादी पक्षाचे ओमी कालानी यांनी कारवाईला विरोध करून पालिकेला आव्हान दिले. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर व्यापा-यात व नागरिकात ओमी कालानी बाबत सहानुभूती मिळू नये. यासाठी स्थायी समितीने अभय योजनेला मंजूरी दिल्याचे बोलले जात आहे. ओमी कालानी यांनी पालिकेला आव्हान दिल्यानेच सत्ताधारी शिवसेना-भाजपाने स्थायी समितीत अभय योजनेला मंजूरी दिल्याचा कांगवा राष्ट्वादीकडून केला जात आहे. तर नागरिक व व्यापा-याचा खरा तारणहार असल्याची प्रतिक्रीया भाजपाकडून उमटत आहे. शिवसेना, कॉग्रेस, साई, रिपाई व मनसे आदी पक्षही श्रेयासाठी पुढे सरसावली आहे.