शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

देशात ५० हजार वनस्पतींपैकी केवळ पाच हजाराची नोंद - सोनल पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 06:26 IST

जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे.

अंबरनाथ - जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. आपल्याकडची पारंपारिक वनौषधी बहुगुणी असली तरी जागतिक स्तरावर त्या औषधांचा फारसा प्रसार झालेला नाही.आयुर्वेदिक औषधे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवू शकली नाहीत. नवनव्या विज्ञान विषय शाखा निवडून देशातील तरु णांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, अस मत सोनल आयकर-पाटणकर यांनी व्यक्त केले. येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते.सरत्या वर्षाच्या अखेरच्या रविवारी मराठी विज्ञान परिषदेने बदलापूर येथील तरूण संशोधक डॉ. सौरभ पाटणकर आणि सोनल आयकर-पाटणकर या दाम्पत्याचे व्याख्यान झाले. जैविक वनस्पतीजन्य पदार्थांपासून अतिसूक्ष्म काष्ठशिल्प बनवण्यात यशस्वी ठरलेल्या प्रयोगाविषयी डॉ. पाटणकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. सध्या पेट्रोलजन्य इंधनामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्याला पर्याय ठरणाºया पर्यावरणस्नेही इंधनांचा सध्या शोध सुरू आहे.अतिसूक्ष्म तंत्रज्ञान शाखेत (नॅनो-टेक्नॉलॉजी) पर्यावरणस्नेही पद्धतीने प्रक्रि या करून जैविक घटकांपासून उर्जा मिळवण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात जैविक कचरा बनतो. त्यापासून उर्जा मिळवली तर ती किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही ठरेल. तसेच त्यामुळे देश स्वयंपूर्ण होईल, असेही सौरभने सांगितले. जैविक घटकांपासून पर्यावरणस्नेही पद्धतीने बनविलेले अतिसूक्ष्म काष्ठशिल्प वैद्यकीय साधने बनवण्यात उपयोगी ठरतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली.सोनल आयकर-पाटणकर मानवनिार्मित जीवशास्त्र विषयात कॅनडामध्ये पीएच.डी करीत आहेत. त्यांनी तुलनेने नवीन असणाºया या विषय शाखेची ओळख करून दिली. तसेच सध्याच्या काळातील तिच्या उपयुक्ततेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कॅनडामध्ये संशोधक म्हणून कार्यरत असलेले सौरभ आणि सोनल मागील आठवडयात भारतात होते. त्यादरम्यान त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, याहेतूने मराठी विज्ञान परिषदेने त्यांचे व्याख्यान ठेवले.हे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी अंबरनाथमधील रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.विज्ञानप्रेमींची गर्दी : आधुनिक विज्ञानातील हे पर्यावरणस्नेही संशोधन देशासाठी उपयोगात आणण्याचा मनोदयही दोघांनी व्यक्त केला. समारंभादरम्यान मराठी विज्ञान परिषदेच्या अंबरनाथ विभागाचे अध्यक्ष प्रा. भगवान चक्र देव यांच्या हस्ते सौरभ आणि सोनल यांचा सत्कार करण्यात आला. अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरांमधील विज्ञानप्रेमी या कार्यक्र माला मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगलIndiaभारत