शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

देशात ५० हजार वनस्पतींपैकी केवळ पाच हजाराची नोंद - सोनल पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 06:26 IST

जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे.

अंबरनाथ - जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. आपल्याकडची पारंपारिक वनौषधी बहुगुणी असली तरी जागतिक स्तरावर त्या औषधांचा फारसा प्रसार झालेला नाही.आयुर्वेदिक औषधे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवू शकली नाहीत. नवनव्या विज्ञान विषय शाखा निवडून देशातील तरु णांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, अस मत सोनल आयकर-पाटणकर यांनी व्यक्त केले. येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते.सरत्या वर्षाच्या अखेरच्या रविवारी मराठी विज्ञान परिषदेने बदलापूर येथील तरूण संशोधक डॉ. सौरभ पाटणकर आणि सोनल आयकर-पाटणकर या दाम्पत्याचे व्याख्यान झाले. जैविक वनस्पतीजन्य पदार्थांपासून अतिसूक्ष्म काष्ठशिल्प बनवण्यात यशस्वी ठरलेल्या प्रयोगाविषयी डॉ. पाटणकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. सध्या पेट्रोलजन्य इंधनामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्याला पर्याय ठरणाºया पर्यावरणस्नेही इंधनांचा सध्या शोध सुरू आहे.अतिसूक्ष्म तंत्रज्ञान शाखेत (नॅनो-टेक्नॉलॉजी) पर्यावरणस्नेही पद्धतीने प्रक्रि या करून जैविक घटकांपासून उर्जा मिळवण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात जैविक कचरा बनतो. त्यापासून उर्जा मिळवली तर ती किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही ठरेल. तसेच त्यामुळे देश स्वयंपूर्ण होईल, असेही सौरभने सांगितले. जैविक घटकांपासून पर्यावरणस्नेही पद्धतीने बनविलेले अतिसूक्ष्म काष्ठशिल्प वैद्यकीय साधने बनवण्यात उपयोगी ठरतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली.सोनल आयकर-पाटणकर मानवनिार्मित जीवशास्त्र विषयात कॅनडामध्ये पीएच.डी करीत आहेत. त्यांनी तुलनेने नवीन असणाºया या विषय शाखेची ओळख करून दिली. तसेच सध्याच्या काळातील तिच्या उपयुक्ततेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कॅनडामध्ये संशोधक म्हणून कार्यरत असलेले सौरभ आणि सोनल मागील आठवडयात भारतात होते. त्यादरम्यान त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, याहेतूने मराठी विज्ञान परिषदेने त्यांचे व्याख्यान ठेवले.हे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी अंबरनाथमधील रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.विज्ञानप्रेमींची गर्दी : आधुनिक विज्ञानातील हे पर्यावरणस्नेही संशोधन देशासाठी उपयोगात आणण्याचा मनोदयही दोघांनी व्यक्त केला. समारंभादरम्यान मराठी विज्ञान परिषदेच्या अंबरनाथ विभागाचे अध्यक्ष प्रा. भगवान चक्र देव यांच्या हस्ते सौरभ आणि सोनल यांचा सत्कार करण्यात आला. अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरांमधील विज्ञानप्रेमी या कार्यक्र माला मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगलIndiaभारत