शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनसे स्वबळावर लढणार

By admin | Updated: March 29, 2017 05:33 IST

भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरीही पक्ष पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

रोहिदास पाटील /अनगाव भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरीही पक्ष पातळीवर जोरदार हालचाली  सुरू झाल्या आहेत. भाजपा तसेच काँग्रेस, समाजवादी पक्ष  बांधत असलेली आघाडीची मोट तर दुसरीकडे शिवसेनेने या आघाडीत न जाता स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेनेही स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार केला आहे. पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार हा पक्षाचा अजेंडा असेल, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळ््या पक्षांची तयारी सध्या सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झालेला नसल्याने थेट घडामोडींना वेग आलेला नाही. मात्र पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांची वर्दळ सुरू झाली आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या समर्थकांसह ठिकठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी दोन प्रभागांचा एक प्रभाग होता. यावर्षी चार प्रभागांचा एक प्रभाग यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सध्या महापालिकेत मनसेचा एकही सदस्य नसला तरी या निवडणुकीत सर्व जागा लढवणार असून, त्यामध्ये यश मिळेल असा विश्वास भिवंडी पूर्वचे शहर-जिल्हाध्यक्ष अफसर खान यांनी व्यक्त केला. विविध पक्षातील कार्यकर्ते मनसेमध्ये येण्यास उत्सुक आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरात आमची ताकद जरी कमी असली तरी विविध विषयांवर आंदोलन, धरणे करून तरुणांना आर्कषित करण्याचा प्रयत्न पक्षाच्यावतीने केला आहे. त्यामुळे पक्षाला यश मिळेल असा दावा खान यांनी केला आहे. खरे चित्र निवडणुकीच्यावेळी स्पष्ट होईल. भिवंडीत पक्षाची ताकद वाढली आहे. मुस्लीम व हिंदू असे अध्यक्ष दिले आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौज आमच्याकडे आहे. यावेळी मनसे परिवर्तन घडवेल अशा पद्धतीने व्यूहरचना तयार करण्याचे काम सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे.- डी. के. म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष. पाणी, रस्ते, बेकायदा बांधकामांमध्ये सर्वच पक्षातील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरु न भ्रष्टाचार केला आहे. आज कर्मचाऱ्यांना तीनतीन महिने पगार मिळत नाही. पालिका डबघाईला आली असून, या विरोधात आवाज उठवणार आहोत. - मदन पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष.पालिकेने शहरात १५ जलकुंभ बांधले. मात्र बहुतांश जलवाहिन्यांमध्ये पाणीच नाही. परिणामी नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या जलकुंभांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. - विकास जाधव, उपाध्यक्ष.