शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मनसे स्वबळावर लढणार

By admin | Updated: March 29, 2017 05:33 IST

भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरीही पक्ष पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

रोहिदास पाटील /अनगाव भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरीही पक्ष पातळीवर जोरदार हालचाली  सुरू झाल्या आहेत. भाजपा तसेच काँग्रेस, समाजवादी पक्ष  बांधत असलेली आघाडीची मोट तर दुसरीकडे शिवसेनेने या आघाडीत न जाता स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेनेही स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार केला आहे. पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार हा पक्षाचा अजेंडा असेल, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळ््या पक्षांची तयारी सध्या सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झालेला नसल्याने थेट घडामोडींना वेग आलेला नाही. मात्र पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांची वर्दळ सुरू झाली आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या समर्थकांसह ठिकठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी दोन प्रभागांचा एक प्रभाग होता. यावर्षी चार प्रभागांचा एक प्रभाग यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सध्या महापालिकेत मनसेचा एकही सदस्य नसला तरी या निवडणुकीत सर्व जागा लढवणार असून, त्यामध्ये यश मिळेल असा विश्वास भिवंडी पूर्वचे शहर-जिल्हाध्यक्ष अफसर खान यांनी व्यक्त केला. विविध पक्षातील कार्यकर्ते मनसेमध्ये येण्यास उत्सुक आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरात आमची ताकद जरी कमी असली तरी विविध विषयांवर आंदोलन, धरणे करून तरुणांना आर्कषित करण्याचा प्रयत्न पक्षाच्यावतीने केला आहे. त्यामुळे पक्षाला यश मिळेल असा दावा खान यांनी केला आहे. खरे चित्र निवडणुकीच्यावेळी स्पष्ट होईल. भिवंडीत पक्षाची ताकद वाढली आहे. मुस्लीम व हिंदू असे अध्यक्ष दिले आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौज आमच्याकडे आहे. यावेळी मनसे परिवर्तन घडवेल अशा पद्धतीने व्यूहरचना तयार करण्याचे काम सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे.- डी. के. म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष. पाणी, रस्ते, बेकायदा बांधकामांमध्ये सर्वच पक्षातील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरु न भ्रष्टाचार केला आहे. आज कर्मचाऱ्यांना तीनतीन महिने पगार मिळत नाही. पालिका डबघाईला आली असून, या विरोधात आवाज उठवणार आहोत. - मदन पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष.पालिकेने शहरात १५ जलकुंभ बांधले. मात्र बहुतांश जलवाहिन्यांमध्ये पाणीच नाही. परिणामी नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या जलकुंभांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. - विकास जाधव, उपाध्यक्ष.