शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच :  अरुण म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 4:46 PM

मौनाची स्पंदने' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभ पार पडला.  

ठळक मुद्देप्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच :  अरुण म्हात्रे मौनाची स्पंदने' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभ या संग्रह निर्मितीचे सारे श्रेय आईला : मानसी कुलकर्णी

ठाणे : कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारात लेखन करताना त्यामधले अनुभव विश्व कवितेच्या पातळीवरचे  असेल तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते. प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल तर ते लेखन ग्रेटच म्हणावे लागेल. मानसी ही खऱ्या अर्थाने भाग्यवान कारण तिला आयुष्याचा पेच नीट समजला आहे. तिला मी तिच्या पुढील लेखनप्रवासास शुभेच्छा देतो अशा भावना ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केल्या. 

         कवयित्री, लेखिका मानसी कुलकर्णी हिच्या पहिल्या 'मौनाची स्पंदने' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी अरुण म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात मानसीला शुभेच्छा देताना वरील उद्गार काढले. ते म्हणाले,  कवितेचा एक विशिष्ट प्रकारचा ग्राफ असतो. सर्वसाधारण विचार सारेच करीत असतात, मात्र त्याच्या पलीकडचा, पुढचा  विचार करणे, स्वतःमधला बदल समजून येणे, शब्दांमध्ये रमताना साक्षात्कार होणे ही सर्व जातिवंत कवीची लक्षणे होत. कविता लेखन करताना स्वतःला सूर सापडणे, नेमका शब्द सापडणे म्हणजे अवघड गोष्ट मात्र ही किमया मानसीला उत्तम साधली आहे.यावेळी अरुण म्हात्रे यांनी  संग्रहातील 'परतीच्या वाटेवर अजूनही' या ही कविता वाचून त्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली. त्यापूर्वी मानसीने आपले मनोगत व्यक्त करताना या संग्रह निर्मितीचे सारे श्रेय आपल्या तिने आपल्या आईला दिले. ती म्हणते " माझी आई ही माझ्या कवितेची पहिली रसिक, वाचक आणि टीकाकार. माझ्यातील कविता शाबूत ठेवण्याचे महत्वाचे काम तिने केले आहे."  हे पुस्तक प्रकाशित करणारे व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले " मानसीच्या शब्दांमध्ये, विषयांमध्ये वैविध्य आहे. तरुणाईची भाषा तिला नेमकी समजली आहे."त्यावेळी व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक नेर्लेकर, संचालक निलेश गायकवाड, मानसीची आई कवयित्री आरती कुलकर्णी आणि बाबा राघव कुलकर्णी हे उपस्थित होते. या संग्रहातील मानसीच्या कवितांचे वाचन अनेक मंडळींनी उत्स्फूर्तपणे केले हे महत्वाचे. या छोटेखानी, घरगुती स्वरूपाच्या प्रकाशन समारंभास साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होते. लेखिका, अनुवादक जयश्री देसाई, मेधा सोमण, साधना जोशी, मेघना साने, दीपा ठाणेकर, मनीषा चव्हाण, साधना ठाकूर, अंजूषा पाटील,पत्रकार प्रज्ञा सोपारकर, वृषाली शिंदे, गीतेश शिंदे, सदानंद राणे, बाळ कांदळकर, राजेश दाभोलकर, आदी मंडळी उपस्थित होती. मानसीच्या 'आकाश कवेत घेताना' हा आत्मकथन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत असे व्यासचे संचालक निलेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. संपूर्ण कार्य्रक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कवयित्री नीता माळी यांनी केले तर आरती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महापूर नरेश म्हस्के यांनीही मानसीला शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक