शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना टिकवायचे कसे आणि आम्हीही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले ...

मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा सवाल

धीरज परब

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले नाही. व्यवसाय आता कुठे कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच परत लॉकडाऊन होणार असेल, तर कर्मचाऱ्यांना टिकवणे ही तर नंतरची गोष्ट, पण जिकडे आम्हीच तग धरू शकणार नाही, त्याचे काय, असा सवाल मीरा-भाईंदरमधील अनेक व्यापाऱ्यांनी केला आहे. मीरा-भाईंदरमधील एकूणच दुकानदार व विविध व्यापाऱ्यांच्या व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आढावा घेतला असता अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. शहरात मोठ्या संख्येने दुकानदार, हॉटेल व अन्य व्यावसायिक हे भाड्याच्या जागेत आपला व्यवसाय करत आहेत. शहरातील भाडीही भरमसाट आहेत.

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात भाड्यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले. तर, काहींनी कसाबसा तग धरला. कारण, बहुसंख्य मालकांनी भाडे अजिबात कमी केले नाही. काहींनी मात्र कमी केले तर काहींनी एखाद्या महिन्याचे भाडे माफही केले. मागील वर्षीच्या लॉकडाऊनकाळातच पगार देणे परवडत नसल्याने बहुसंख्य कर्मचारीवर्ग कमी करण्यात आला. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येईल, या आशेने व्यापारीवर्ग होता. पदरमोड करून काहींनी दुकानाचे भाडे भरले व कर्मचारीही टिकवले. परंतु, व्यवसाय हळूहळू का होईना पुन्हा उभा करू, अशी आशा व जिद्द बाळगून व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. पण, लॉकडाऊन सुरू झाल्याने आता मात्र सहनशीलतेच्या पलीकडे सर्व गेल्याच्या भावना व्यापारीवर्गात आहेत. कारण, नुकसान सहन तरी किती करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतोय. आपणच इतके अस्थिर झालेले आहोत, तर कर्मचाऱ्यांना कसे पोसायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे त्यांच्याकडे काम करत असले तरी मागील लॉकडाऊनकाळात त्यांना शक्य तेवढा पगार देऊन टिकवून ठेवले होते. पण, पुन्हा लॉकडाऊन म्हणजे व्यवसायच बंद करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे कृष्णा जेना याने सांगितले.

मालक किती महिने पगार देणार?

लॉकडाऊनची कळ व्यापारी काही महिने व काही वर्षे सोसतीलही. पण, कर्मचाऱ्यांनी कुठे जायचे? व्यवसायच बंद असेल तर मालक किती महिने पगार, पैसे देणार. शेवटी, आमच्या रोजगारावर संक्रांत आहेच, अशी व्यथा भावेश म्हात्रे या कर्मचाऱ्याने मांडली. लॉकडाऊन हा आता पर्याय राहिलेला नसून विनामास्क फिरणारे, गर्दी करणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर आणि सातत्याने कारवाईची गरज आहे. त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत व कोरोनालाही आळा घालणे अशक्य असल्याचे सुरेश पाटील म्हणाले.