शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 16:31 IST

सोमवारी फडणवीस यांनी ठाण्यातील भाईंदर पाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटर व कोवीड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर कोरोना बाबात करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबाबत चर्चा केली.

ठाणे  : आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही, महाविकास आघाडीचे सरकार हे अंतर्गत वादातूनच पडेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केला. आम्हाला सरकार पाडण्यापेक्षा राज्यातील 12 कोटी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु कोवीड पासून जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी राऊत हे असे काही तरी लिखाण करतात, आणि मुख्य मुद्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

  सोमवारी फडणवीस यांनी ठाण्यातील भाईंदर पाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटर व कोवीड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर कोरोना बाबात करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला आहे. राज्याच्या दृष्टीकोणातून एखादा विषय महत्वाचा असेल, सरकाराचे अपयश झाकायचे असेल तेव्हा असा कपोलकल्पीत लेख लिहून विरोधक सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे लिहितात. परंतु आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही, 12 आमदार आहेत, सरकार पाडणार असे काही नाही. या उलट आम्हाला राज्यातील 12 कोटी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगितले. 

पोलिसांच्या बदलीच्या बाबत समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक पाहता पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करीत असतांना सीपी हे गृहमंत्र्यांशी चर्चा करतात, त्यानंतर गृहमंत्र्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायची असते. परंतु असे काही झालेलेच दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच समन्वयाच्या अभावामुळे किंवा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे वेगळे असल्याने यातूनच असा प्रकार घडला असेल असेही त्यांनी सांगितले.

केंद्राकडून कोवीड साठी 9क् हजार कोटींचा आरएसीच्या माध्यमातून निधी मंजुर केला आहे, त्यातून राज्य सरकारला 9 हजार कोटी मिळू शकतात. परंतु ते मिळविण्याऐवजी उलट केंद्र सरकारकडेच नितीन राऊत बोट दाखवून केंद्राने काहीच मदत केली नसल्याचा गवगवा करीत आहेत. आतापर्यंत महामारीच्या काळात एवढी मदत झालेली नव्हती. परंतु ती मिळविण्याऐवजी नको त्या विषयांना खतपाणी घातले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस