शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

घोषणांच्या बाजारात फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 11:27 PM

सरकारविरोधात संताप : पॅकेजचा विसर पडल्याची टीका

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रथम संचारबंदी आणि त्यानंतर लॉकडाऊन लागू केला. या लॉकडाऊनमध्ये रोजी बंद असली तरी रोटीची व्यवस्था केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यात रिक्षाचालक, फेरीवाले यांच्या खात्यात दीड हजार रुपये १५ ते ३० एप्रिलपर्यंत जमा केले जातील, अशी घोषणा केली. मात्र, आता पुन्हा १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला तरी अद्याप फेरीवाल्यांच्या खात्यात एक दमडीही जमा झालेली नाही.

सरकारची रोटी देण्याची घोषणा केवळ कागदावर असून ती हवेत विरली आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या पॅकेजची रक्कम गेली कुठे असा सवाल फेरीवाले करीत आहेत. सरकारने ही रोटीची रक्कम देण्यासाठी नोंदणीकृत फेरीवाल्यांचा निकष लावला होता. नोंदणी नसलेले फेरीवाले हे माणूस नाहीत का असाही सवाल नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनी केला. मात्र, आता नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांच्या पदरातही काही पडलेले नाही. दिवसाला १०० रुपये याप्रमाणे पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनचा अंदाज घेता दीड हजार रुपये जमा करण्यात येतील असे सांगितले होते. पहिल्या पंधरा दिवसांची रक्कमच खात्यात जमा झालेली नसताना लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीसाठी कोणतीही मदत नाही. पहिलीच मदत प्राप्त झालेली नसताना दुसऱ्या मदतीची अपेक्षा कशी काय करणार असा प्रश्न फेरीवाल्यांनी केला आहे. फेरीवाल्यांसाठी लढा देणाऱ्या डाव्या संघटनांनी महाविकास आघाडीची ही घोषणा निव्वळ अफवा होती अशी टीका केली आहे. संचारबंदीयुक्त लॉकडाऊनमुळे १४ एप्रिल ते १५ मे पर्यंतचा फेरीवाल्यांचा धंदा बुडाला आहे. महिनाभर बसून असल्याने कुटुंबाच्या पोटाला खायला  काय घालायचे असा प्रश्न फेरीवाल्यांना सतावित आहे. रोजी पण नाही आणि रोटी पण नाही अशी स्थिती फेरीवाल्यांवर आली आहे.

फेरीवाले काय म्हणतात

आमचा रोजगार बुडाला आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा पूर्ण रोजगार ठप्प होता. लाट ओसरल्यावर कुठे धंदा सुरू झाला होता. आता पुन्हा बंद आहे. पोटाला काय खायचे असा प्रश्न आहे. सरकारने घोषित केलेली मदत खात्यात जमाच झालेली नाही.         -विलास उतेकर

मी नोंदणीकृत फेरीवाला आहे.  राज्य सरकारने लॉकडाऊन करताना जाहीर केलेली रक्कम कशी आणि कुठून मिळणार, याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे मी मदतीपासून वंचित आहे. माझ्याबरोबर इतरांनाही मदत मिळालेली नाही.         - रामदास बोडके

अनेकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, त्यापैकी एकाच्याही खात्यात दीड हजार रुपये जमा झालेले नाहीत. घोषणा करणाऱ्या सरकारने केवळ घोषणा करून आशा लावण्यापेक्षा खरोखरच ही मदत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली की नाही याची पाहणी करावी.    - संतोष गुप्ता

सरकारने घोषणा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातील पत्रक अथवा आदेश आमच्या विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अद्याप आमच्याकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. सरकारी आदेश प्राप्त झाल्याशिवाय नक्की काय व कशा प्रकारे करायचे हे अद्याप स्पष्ट नाही.    - प्रशांत गवाणकर, फेरीवाला विभाग अधिकारी, केडीएमसी.

 

टॅग्स :thaneठाणे