शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पालघरच्या ग्रामीण भागात मुबलक पाणी

By admin | Updated: August 18, 2015 23:10 IST

संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवित असून पालघर जिल्ह्यात

पालघर : संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवित असून पालघर जिल्ह्यात या अभियानांतर्गत ५१ गावांमध्ये कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक वर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर होऊन मुबलक पाणीसाठा निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केला.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मौजे खरशेत येथील वनबंधाऱ्यातील पाणीसाठ्याचे जलपूजन शनिवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रकाश पवार इ. मान्यवर उपस्थित होते.या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पालघर- ४, वसई- ४, डहाणू- ४, तलासरी- ४, वाडा- ५, विक्रमगड- ७, जव्हार- ११ तर मोखाडा- ११ गावांची निवड करण्यात आली असूनपावसाचे वाहून जाणारे पाणी शिवारातच बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे यांच्या माध्यमातून अडविण्यात आले आहे. त्यामुळे भूगर्भाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरी व बोअरवेलना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगून नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन केले. (वार्ताहर)