शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

Corona Virus: कामानिमित्त परदेशात गेलेले ९८ नागरिक कोकणात परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 1:36 AM

चीनमधून आले २४ जण : सर्व प्रवासी निगराणीखाली

ठाणे : परदेशात काही कामांनिमित्त किंवा पर्यटनाला कुटुंबासह गेलेल्यांपैकी ९८ जण भारतात परतले आहेत. सर्व जण कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील रहिवासी असून, त्यांच्यापैकी २४ जण चीनमधून आल्याची माहिती पुढे आली आहे.या ९८ पैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, हे सर्व आता निगराणीखाली असून स्थिर आहेत. विशेष म्हणजे, त्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पालघरसारख्या ग्रामीण जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात परदेशातून परतले आहेत. यात १४ दिवसांची निगराणी पूर्ण करणारे २८ जण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हजारो नागरिकांचा जीव गेल्यामुळे जगभरात हाय अ‍ॅलर्ट जाहीर केला आहे. सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने, तो होऊ नये याची खबरदारी घेणे हाच पर्याय उरला आहे. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मास्कचा तुटवडा सर्वत्र निर्माण झाला आहे. दुसरीकडे परदेशात गेलेले भारतीय नागरिक भारतात परतत मायदेशी परतत आहेत.

कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत १० मार्चपर्यंत एकूण ९८ नागरिक परदेशवारी करून परतले आहेत. कोरोना विषाणूबाबतची विशेष खबरदारी म्हणून या प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून, दक्षता म्हणून त्यांना १४ दिवसांच्या निगराणीसाठी ठेवले आहे. त्यातून २८ जण त्या दिवसांच्या निगराणीतून बाहेर पडले आहेत, तसेच उर्वरित ७० जण हे स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिकानिहाय कक्ष तयारजिल्हा प्रशासनाने खबरदारी घेऊन ठाणे जिल्ह्यातील महापालिकानिहाय कक्ष तयार करून बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत. त्यानुसार, ठाणे सिव्हिलमध्ये सात बेड्स आणि एक व्हेंटिलेटर ठेवले आहे. तसेच ठामपाच्या कळवा आणि नवी मुंबईच्या वाशी रुग्णालयात प्रत्येकी आठ बेड्स आणि एक व्हेंटिलेटर, भिवंडीतील इंदिरा गांधी येथे सहा आणि खासगी रुग्णालयात २० बेड्स, उल्हासनगर येथे सहा, पंडित भीमसेन जोशी मीरा-भाईंदरमध्ये दहा, मालाड-मालवणी येथे सहा, तसेच क ल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात दहा बेड्स उपलब्ध ठेवल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.या देशातून आले प्रवासीठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांत एकूण ९८ नागरिक परदेशातून आले आहेत. त्यामध्ये चीनमधून-२४, इराण-३०, इंडोनेशिया आणि सिंगापूर ३६ तसेच इटली, थायलंड येथून आलेल्या आठ नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस