शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

लस न देताच उत्सव करायला सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आजच्या घडीला १० ते १२ लाखांच्या घरात सांगितली जाते; पण केवळ एक लाख ...

मीरा रोड : मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या आजच्या घडीला १० ते १२ लाखांच्या घरात सांगितली जाते; पण केवळ एक लाख लसी दिल्या त्या संपलेल्या असताना लसीचा आणखी पुरवठा न करताच लस उत्सव साजरा करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करीत जाहीर केले आहे; पण लस न देताच उत्सव साजरा करा सांगणे म्हणजे ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी स्थिती ओढावली असल्याने संताप व्यक्त होत होत आहे.

मीरा-भाईंदरसाठी सरकारकडून एक लाख सहा हजार ६२० लस पुरविण्यात आल्या होत्या; परंतु गेल्या गुरुवारी रात्री केवळ ३ हजार ३४० लस शिल्लक राहिल्याने महापालिकेने लसीकरण बंद केले आहे. ११ पैकी पालिकेची सहा लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत, तर पाच लसीकरण केंद्रांवर रोज दुसरा डोस बाकी असलेल्या प्रत्येकी १०० लोकांनाच लस दिली जात आहे. कोरोनाचा कहर वाढला असताना दुसरीकडे लसीकरण बंद झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे ११ एप्रिलपासून देशभरात लसीकरण उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे; पण पालिकेकडे लसच नाही, तर उत्सव कसला साजरा करताय असा सवाल नागरिकांनी थेट मोदींना केला आहे.

कोरोनाच्या संसर्गात लोकांचे जीव जात असताना केंद्रातील भाजप सरकार मात्र निव्वळ स्वतःची राजकीय पोळी भाजत विरोधकांवर राजकीय सूड उगवीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. राज्याची लोकसंख्या आणि तेथील कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन लसींचे वाटप केंद्रातील मोदी सरकारने करायला हवे होते; परंतु त्यांनी केवळ भाजपशासित राज्यातच जास्त प्रमाणात लसी देऊन विरोधी पक्षांच्या ताब्यातील राज्यांना मात्र तुटपुंजी लस दिल्याचा आरोपही गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिक असलेले अनंत आंगचेकर यांनीही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे हे घाणेरडे राजकारण देशाला विनाशाच्या आणि सूडाच्या खाईत लोटणारे आहे. लोकांना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे अशी यांची गत आहे. लोकांच्या जीव आणि आरोग्याशी खेळणाऱ्या या मोदी सरकारला माफ करता येणार नाही.

------------------

भाजपला कोरोनाची महामारी कितीही पसरली व कितीही लोकांचे बळी गेले तरी त्यांना त्यांची सत्ता आणि राजकारण प्यारे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन केंद्राने लसींचा पुरवठा करणे आवश्यक असताना मोदी आणि भाजप केवळ सूडबुद्धी व आकस ठेवून राज्यातील जनतेवर अत्याचार, अन्याय करीत आहेत. मोदींनी जाहीर केलेला हा लसीकरण उत्सव नसून फसवीकरण उत्सव आहे.

नीलम ढवण, गटनेत्या, शिवसेना

लसीकरण उत्सवाबाबत अजून कोणतेही मार्गदर्शक निर्देश आलेले नाहीत. पालिकेकडे लसींचा साठा नसल्याने लसीकरण उत्सव साजरा करणे उद्या तरी शक्य नाही. सरकारकडे एक लाख लस मागितल्या आहेत. लसींचा पुरवठा झाल्यावर आवश्यक ते सर्व नियोजन करून लसीकरण उत्सव सुरू करणार आहोत.

- डॉ. अंजली पाटील, लसीकरण अधिकारी, महापालिका