शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

प्रवेशक्षमता जास्त ; विद्यार्थी संख्या कमी! अकरावीसाठी ११२०९० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 3:17 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत यंदा एक लाख तीन हजार ४५१ विद्यार्थी जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत.

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत यंदा एक लाख तीन हजार ४५१ विद्यार्थी जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा यंदा अकरावी प्रवेशासाठी कला, वाणिज्य आणि सायन्स या तीन प्रमुख शाखांमध्ये एक लाख १२ हजार ९० जागा ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत उपलब्ध आहेत. यामुळे कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना आवडीच्या शाखेत प्रवेश मिळणे सहज शक्य असल्याचे दिसून येत आहे.दहावीचा निकाल लागताच आॅनलाइन व आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून हाती घेतली जात आहे. येथील माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी एक लाख १२ हजार ९० जागा उपलब्ध केल्या आहेत. यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेश उपलब्ध करण्यात आले आहेत. तर, आॅफलाइन अकरावी प्रवेशसाठी १२ हजार ७६० जागा ग्रामीण भागासाठी उपलब्ध आहेत.जिल्ह्यात कला शाखेत १२ हजार ९७० प्रवेश होणार आहेत. यामध्ये २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे आहेत. याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील असून चार हजार विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील. विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित सुमारे २०० जागा आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया आहे. यासाठी कला शाखेच्या ७२०, विज्ञान शाखेच्या ९६० जागा आणि वाणिज्यच्या तीन हजार ६०० जागा अकरावीसाठी आहेत. या तिन्ही शाखांचे पाच हजार २८० अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश मिळणार आहेत. सहा हजार ४८० प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होतील.

टॅग्स :educationशैक्षणिकnewsबातम्या