शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

चुकलेल्या नियोजनामुळे नालेसफाईचे तेच रडगाणे 

By अजित मांडके | Updated: June 24, 2024 06:29 IST

ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, मीरा भाईंदर येथील शहरांचे नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही.

ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी चांगल्या पद्धतीने नालेसफाई झाली आहे, असा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी तो फोलपणा आता समोर आला आहे. नालेसफाईचे नियोजन नसणे, चुकलेली नाले बांधणी, अरुंद झालेले नाले, नाल्यांचा बदलेला प्रवाह, नाल्याशेजारी झालेली बांधकामे आणि नागरिकांचा असहकार आणि ठेकेदारांकडून नालेसफाईच्या नावावर केल्या जात असलेल्या हात की सफाईमुळे नालेसफाईचे रडगाणे हे वर्षानुवर्षे सुरूच आहे. हे केवळ ठाण्यातच नाही, तर जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणीही असाच प्रकार असल्याने त्याचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे.

ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, मीरा भाईंदर येथील शहरांचे नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही. किंबहुना विकास आराखड्यानुसार ही शहरे वसलेली नाहीत. या शहरांना अनधिकृत बांधकामांचा विळखा पडलेला आहे. त्यातही पालिकेकडून केल्या जात असलेल्या कामांचे अयोग्य पद्धतीने नियोजन, काही निर्धारित मर्जीतील नागरिकांसाठी हव्या त्या पद्धतीने रस्त्यांची बांधणी, नाल्यांची बांधणी केली जात आहे. तसेच एखाद्याला नाल्याचा अडसर ठरत असल्यास त्या नाल्याचा प्रवाह बदलला जात आहे. मात्र, त्यावर पालिका काहीच हरकत घेत नाही. त्याचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागतो. 

ठाणे महापालिका हद्दीत ३०८ मोठे, तर १२९ छोट्या नाल्यांचा समावेश आहे. दरवर्षी या नालेसफाईसाठी महापालिका ८ ते १० कोटी खर्च करते. परंतु, वरवरची नालेसफाई करून ठेकेदारही हात की सफाई करीत आहे. त्यातही नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचे पालिकेनेदेखील आता मान्य केले आहे. या नाल्यांची बांधणी करताना ती योग्य पद्धतीने झालेली नाही. काही ठिकाणी नाल्यांचा प्रवाह बदलला आहे, तर काही ठिकाणी नाला अरुंद करण्यात आला आहे, घोडबंदर भागात तर हे चित्र हमखास दिसते. या ठिकाणी नवनवीन गृहसंकुले होत असल्याने त्याठिकाणी नाल्यांचा ताप नको म्हणूनच असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र, त्याकडे कानाडोळा केला जात आहे. शहरात इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने नाल्यांची चुकीच्या पद्धतीने बांधणी झालेली आहे. त्यातही सफासफाईच्या बाबतीत महापालिकेचा नियोजनशून्य कारभारही याला तितकाच जबाबदार आहे. मुंब्रा, दिव्याचा विचार केल्यास दिव्यात तर नाल्यांची बांधणी झालेलीच नाही.

उपाययोजना प्रत्यक्षात उतरतील?आयुक्तांनी यावर उपाय म्हणून नागरिकांशी संवाद साधण्याचे आवाहन प्रभाग स्तरावर सहायक आयुक्तांना दिले आहे त्यांच्याशी संवाद साधून जनजागृती करणे, नाल्यात कचरा टाकण्याऐवजी तोच कचरा घंटागाडीत टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, यासाठी घंटागाड्यांच्या वेळा निश्चित करणे, नाल्यात कचरा पडणार नाही, यासाठी उपाययोजना करणे, आदी उपक्रम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, हे उपक्रम हाती घेतले जातील का? की हवेतच विरतील हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे