शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी लढत, विकासकामे, अनुभवामुळे सोपल विजयी

By admin | Updated: October 21, 2014 13:53 IST

दिलीप सोपल यांनी केलेली विकासकामे, भाजपची उमेदवारी, त्यामुळे शिवसेनेला मानणार्‍या मतांचे झालेले विभाजन तसेच निवडणुकीतील सर्व तंत्रांचा केलेला अवलंब याचा फायदा झाला.

शहाजी फुरडे-पाटील■ बाश्री

मंत्रिपदाच्या काळात दिलीप सोपल यांनी केलेली विकासकामे तसेच महायुतीचे गणित बिघडल्याने मतदारसंघात आलेली भाजपची उमेदवारी, त्यामुळे शिवसेनेला मानणार्‍या मतांचे झालेले विभाजन तसेच निवडणुकीतील सर्व तंत्रांचा केलेला अवलंब याचा फायदा झाला. अनुभवाच्या जोरावर राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल हे सहाव्यांदा विधानसभेत जाण्यात यशस्वी झाल्याचे निकालावरून दिसून येते. 
सेना-भाजपबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही स्वतंत्र लढली असली तरी काँग्रेसचे सुधीर गाढवे यांना जादा मते न मिळाल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा कोणाच्याच विजयात व पराजयात हातभार लागला नाही. भाजपचे राजेंद्र मिरगणे यांना मागील वेळेचे सेनेचे उमेदवार विश्‍वास बारबोले यांच्याएवढीही मते मिळवता आली नाहीत. त्यांना केवळ १६,५0६ मते मिळाली तर काँग्रेसचे सुधीर गाढवे यांना अवघी १६५४ मते मिळाली आहेत. तिरंगी किंवा बहुरंगी लढत झाल्यास सोपल हे निवडून येतात, अशी मतदारांची खात्री होती व मतदारसंघात देखील तशी चर्चा होती. त्याप्रमाणे भाजपच्या साथीने झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे राऊत यांचा बळी गेला व सोपल यांचा विजय सुकर झाला. 
सोपल विरोधात माजी आ. तथा शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी कडवी झुंज दिली. त्यांचे कार्यकर्ते देखील जिवाचे रान करून ईर्षेने पळाले, परंतु त्यांना निम्म्या वैराग भागाने मताधिक्य दिले. मात्र निम्म्या भागाने सोपल यांना साथ दिली. उत्तर बाश्रीतील पांगरी जि. प. गटाने सोपल यांना अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे २६४७ चे मताधिक्य दिल्याने ग्रामीण भागातील मताधिक्य ग्रामीण भागातच कमी झाले. बाश्री शहर हे आजवर सोपल यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलत आले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही बाश्री शहराने सोपल यांना मागील वेळेपेक्षा जास्त म्हणजे ५१0४ मते जास्त दिली. त्यामुळे राऊत फारच मागे पडले. साम, दाम, दंड, भेद ही नीती राजकारणातील अस्त्रेही विजयाचा मार्ग मोकळा करून गेली. 
सोपल यांच्या १९८५ ते १९९९ या काळात त्यांच्या विरोधात लढलेला विरोधक पुन्हा लढण्यात यशस्वी झाला नाही, मात्र राऊत हे १९९९ पासून प्रत्येक निवडणुकीत सोपल यांना झुंजत आहेत. सोपलांचे कट्टर विरोधक अशी प्रतिमा असल्याने सोपलविरोधी गट राऊत यांच्या पाठीमागे एकवटला. आजही तो कायम आहे. २00९ ला विश्‍वास बारबोले यांच्यामुळे मराठा मतात झालेले विभाजन सोपलांच्या फायद्याचे ठरले. यावेळीही मिरगणे यांच्या रूपाने मराठा उमेदवारच तिरंगी लढतीत आला. त्यात पुन्हा दोघांचे पक्ष हिंदुत्वाच्या विचारधारेचे असल्याने त्यांच्या मतात विभागणी झाली. धर्मनिरपेक्ष मतांचे ध्रुवीकरण झाले अन् तेही सोपल यांच्या पथ्यावर पडले.
याचबरोबर निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा असलेल्या बाश्री उपसा सिंचन योजनेच्या भागातील वांगरवाडी गावात केवळ सोपल यांना मताधिक्य मिळाले, उर्वरित गावे राऊतांच्या पाठीशी गेली. सोपल यांनी पाणीपुरवठा मंत्री म्हणून अनेक गावांना मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजना, ३0 वर्षांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे, वैयक्तिक कामे, त्यांचे कर्तृत्व हे मुद्दे देखील विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले आहेत. 
राऊत यांनी निवडणुकीतील प्रचारात वैराग तालुका निर्मिती, वैराग व बाश्रीची एमआयडीसी, बाश्री उपसा सिंचन या मुद्यांना हात घातला. तसेच संतनाथचा विषयही ऐरणीवर आणला होता. त्यामुळे वैराग भागातून त्यांना मते मिळाली. विश्‍वास बारबोले, संतोष निंबाळकर यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी देखील जिद्दीने पळाले व यामुळेच राऊत हे सोपल यांचे मताधिक्य कमी करू शकले. राऊत यांना वैराग भागातून मोठे मताधिक्य मिळेल असा अंदाज होता. मताधिक्य मिळाले मात्र ते विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाही. पांगरीवरील त्यांचा अंदाजही चुकला, इथेच राऊतांचे विजयाचे गणित हुकले. ग्रामीण भागात सोपल यांना पांगरी जि. प. गटातून २६४८ तर गावामध्ये खामगावातून सर्वाधिक ५५६ मताधिक्य मिळाले. राऊत यांना श्रीपतपिंपरी जि. प. गटातून १५४७ तर गावामध्ये गुळपोळीत ७२६ मताधिक्य मिळाले. त्यामुळे युवराज काटे व इंद्रजित चिकणे यांचे गावावरील वर्चस्व दिसून येते. अपेक्षित मताधिक्य नाही ■ तरीही गतवेळच्या निवडणुकीतील मते व यावेळच्या निवडणुकीतील मते पाहता राऊत यांच्या मतात सोपल यांच्यापेक्षा वाढच झाल्याचे दिसून येते. सोपल यांचा विजय झाला असला तरी त्यांच्या मताधिक्यामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. लहान असो वा मोठा, विजय हा विजयच असतो. तरीही अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांना एक संदेश देणारा हा निकाल आहे.