शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...!

By appasaheb.patil | Updated: May 29, 2020 13:12 IST

मध्य रेल्वे विभागात १५०० जवान तैनात; लॉकडाऊन काळातही सुरक्षा बलाच्या जवानांची अहोरात्र केली प्रवाशांची सेवा

ठळक मुद्देगरजू प्रवाशांना, कंत्राटी कामगारांना भोजन, मास्क पुरवठा करण्यासाठी दररोज सुमारे १ हजार आरपीएफ कर्मचारी तैनात सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औषधोपचाराची गरज असणाºया प्रवाशांना पुढील स्थानकात रेल्वेचे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचेही काम

सुजल पाटील 

सोलापूर : कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविरुद्ध सर्व देशभर सुरू असलेल्या युद्धाच्या वेळी मध्य रेल्वेचारेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सामाजिक जाणीव आणि प्रतिबंध या प्रत्येक बाबतीत अग्रभागी आहे. रेल्वे अधिकाºयांसमवेत खांद्याला खांदा लावून उभे असलेले आरपीएफचे कर्मचारी, श्रमिक प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी, अपघात टाळण्यासाठी, हजारो मजुरांना अन्नपुरवठा करण्याबरोबरच ३५० श्रमिक ट्रेनमधून पाच लाखांहून अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी १ हजार ५०० जवान अहोरात्र रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकावर तैनात राहून आपले कर्तव्य बजाविल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

लॉकडाऊन काळातही रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करणे, महिला व मुलांना मदत करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधी सल्लामसलत करणे व त्यांना सुरक्षित प्रवासासाठी आरपीएफ जवान लॉकडाऊन काळातही कार्यरत आहेत. कोणत्याही सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औषधोपचाराची गरज असणाºया प्रवाशांना पुढील स्थानकात रेल्वेचे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचेही काम केले आहे. 

दरम्यान, गरजू प्रवाशांना, कंत्राटी कामगारांना भोजन, मास्क पुरवठा करण्यासाठी दररोज सुमारे १ हजार आरपीएफ कर्मचारी तैनात करण्यात येत असल्याचेही मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.  

परप्रांतीयांना घेऊन जाणाºया  गाड्यांना एस्कॉर्ट करणे, प्रवाशाने मास्क घातला की नाही यावर नजर ठेवणे, ट्रेनमध्ये आत जाताना, ट्रेनमधील प्रवासात आणि  सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही यावर लक्ष ठेवण्याचेही काम आरपीएफ जवान करीत आहेत.  यासाठी १ हजार ५०० हून अधिक आरपीएफ जवान तैनात करण्यात आल्याचे आरपीएफने सांगितले.

३७ हजार २०० मजुरांना जेवणाचे डबेच्मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाने एकत्रित येऊन निधी संकलित केला. या जमा झालेल्या निधीतून आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात बेघर, निराधार, गरीब अशा ३७ हजार २०० लोकांना जेवणाचा डबा दिला. याशिवाय रेल्वे स्थानकावर श्रमिक ट्रेनने प्रवास करणाºया प्रवाशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी ते अहोरात्र पार पाडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जवानांनी बनविले मास्क...- या संकटाच्या काळात आरपीएफच्या कर्मचाºयांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन  कोरोना आजारापासून आरपीएफच्या जवानांना वाचविण्याच्या आणि मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना पूरक ठरण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण मास्क बनविले. आतापर्यंत १३ हजार ९१९ मास्क, १ हजार ५२२ फेस शिल्ड कव्हर आणि ४३४ शिल्डो मास्क बनविले. 

आपल्या दलाचे मनोबल उंचावणे आणि त्यास धैर्याने तोंड देण्याची तयारी ठेवली आहे. दैनंदिन कामकाजावर मध्य रेल्वेचे अधिकारी पुढाकार घेऊन नियमितपणे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. जवान व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मोबाईल फोन, वेब सक्षम सेवा, वेबिनार इत्यादींद्वारे संवाद साधण्यात येत आहे. -शैलेश गुप्ता,विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग 

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस