शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

प्रेरणादायी प्रवास; भेळगाडीवर उभारला चौघांचा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 3:44 PM

अशिक्षित माता-पित्यांनी बनवलं तिघांना प्राध्यापक, कलाशिक्षक अन् लिपीक

ठळक मुद्दे१९७० च्या दशकामध्ये वसंत भाऊराव खिलारे पंढरपूर तालुक्यात चळे येथून रोजीरोटीच्या निमित्ताने सोलापुरात आलेअशोक चौक परिसरामध्ये दोन भाड्याच्या खोल्यामध्ये संसार थाटला. आयुष्यात नाही कधी म्हणायचं नाही आणि कोणतंही काम चांगलं-वाईट नसतं ते आपल्या मानण्यावर अवलंबून असतं

विलास जळकोटकर 

सोलापूर: जिद्द आणि चिकाटी जोडीला दुर्दम्य इच्छाशक्तीची जोड असली की अशक्य ते शक्य करण्याची किमया साधते. असंच काहीसं अशिक्षित माता-पित्यांनी चक्क भेळचा गाडा चालवून लेकीचा-लेकांचा सुखी संसार तर उभारलाच शिवाय तिघांना प्राध्यापक, कलाशिक्षक अन् ग्रंथपाल बनवून आयुष्यात अशक्य काहीच नाही असा संदेश वसंत आणि द्वारकाबाई खिलारे दाम्पत्यांनी दिला आहे.

१९७० च्या दशकामध्ये वसंत भाऊराव खिलारे पंढरपूर तालुक्यात चळे येथून रोजीरोटीच्या निमित्ताने सोलापुरात आले. अशोक चौक परिसरामध्ये दोन भाड्याच्या खोल्यामध्ये संसार थाटला. पोटासाठी काहीतरी करायचे म्हणून वसंत खिलारे आणि त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी या परिसरात भेळ तयार करुन विकायची त्यातून मिळणाºया पैशातून गुजराण करायची हा त्यांचा नित्यक्रम बनला. द्वारकाबाईच्या हातच्या खमंग भेळची हळूहळू परिसरात चर्चा होऊ लागली. मग चारचाकी गाड्याद्वारे हा व्यवसाय सुरु झाला. हळूहळू जम बसला. राजू, अंबादास, नितीन ही मुलं शाळा शिकत आई-वडिलांना मदत करु लागली. 

कामावरची निष्ठा आणि मुखी गोडवा या बळावरच खिलारे दाम्पत्यांनी आपण शाळेत जाऊ शकलो नाही पण मुलांना अशिक्षित ठेवायचं नाही या भावनेनं त्यांना शाळेपासून वंचित ठेवलं नाही. मोठी मुलगी सुरेखा, त्यानंतर राजू, अंबादास, आणि नितीन यांनी जिद्दीनं आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. हा सारा संसाराचा गाडा केवळ एका भेळगाडीवर सुरु होता. मोठ्या मुलीचं लग्न झालं.

दोन नंबरचे राजू सध्या लोकसेवा हायस्कूलमध्ये लिपिक तर आणि चार नंबरचे नितीन खिलारे हे कलाशिक्षक म्हणून एकाच शाळेत सेवा बजावत आहेत. दोन नंबरच्या अंबादास यांनीही प्रगतीचा टप्पा पार करीत प्राध्यापकाची नोकरी मिळवली. ते सध्या लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे अध्यापनाचे काम करतात.  भाड्याच्या घरात राहणारे खिलारे दाम्पत्य स्वत:च्या मालकीच्या घरामध्ये वास्तव्यास आहेत. भेळ गाडीमुळेच हे सारं साध्य झाल्याची जाणीव सर्वांनाच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं. 

भेळ हीच आमची लक्ष्मी ! आयुष्यात नाही कधी म्हणायचं नाही आणि कोणतंही काम चांगलं-वाईट नसतं ते आपल्या मानण्यावर अवलंबून असतं. मन लावून मेहनत करा या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आम्ही भावंडं शिकू शकलो. भेळ गाडीमुळं आमचा संसार फुलला. तीच खरी आमची लक्ष्मी आम्ही मानतो. ३५ वर्षांच्या प्रदीर्घ व्यवसायानंतर गेल्या आठ वर्षांपासून अथक परिश्रम करणारे आमचे आई-वडील प्रसन्न चित्ताने आयुष्य जगताहेत हीच आमच्या दृष्टीनं समाधानाची बाब असल्याची भावना कलाशिक्षक तथा चित्रकार नितीन खिलारे यांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसाय