शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

सोलापूर जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना देणार ओळखपत्र; ग्रामपंचायतीवर मोठी जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 5:33 PM

समाजकल्याणने दिले जिल्हा परिषदेला पत्र

सोलापूर : ऊसतोड कामगारांना कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासनातर्फे ओळखपत्र देण्यात येणार आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाने सुरू झाले आहेत. या साखर कारखान्यांसाठी बीड, नांदेड, हिंगोली, परभणी येथील कामगार आले आहेत. ऊसतोडीचा हंगाम सुरू झाल्यावर ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनावर येते. जिल्ह्यात ४० साखर कारखाने आहेत. यातील जवळपास ३० कारखाने सुरू झाले आहेत. पूर्वी कारखान्यांकडे बैलगाड्या असायच्या. त्यामुळे ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असायची. पण आता बैलगाडीऐवजी ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर ऊसतोडीसाठी यंत्राचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे कारखान्यांकडील कामगारांची संख्या कमी झाली असली तरी कारखान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्या मुलांसाठी शाळा व कुटुंबांना इतर योजनांचा लाभ देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

समाजकल्याण विभागामार्फत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. पण राज्य समाजकल्याण विभागाकडे ओळखपत्र देण्यासाठी यंत्रणा नसल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मदत करावी, असे पत्र दिले आहे. ग्रामपंचायत विभागाने गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसेवकांशी संपर्क साधून त्यांच्या हद्दीतील साखर कारखान्यावर जे मजूर आले आहेत, त्यांचे सर्वेक्षण करून ओळखपत्र वाटपास मदत करावी, असे सुचविले आहे. पण सध्या ग्रामपंचायत विभागाकडे लसीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व गावची विकासकामे ही मोठी जबाबदारी असल्याने हे काम कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना सूचना

राज्य समाजकल्याण विभागाने ऊससोड कामगारांना ओळखपत्र वाटपासाठी मदत करण्याबाबत पत्र दिले आहे. संबधित ग्रामपंचायतीवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत साखर कारखाने आहेत, त्यांच्याकडून ग्रामसेवकांने ही माहिती घेऊन अहवाल सादर करायचा आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद