शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक

By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 12:20 IST

सोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ८१ इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाºयांकडून प्रस्ताव आले आहेत.

ठळक मुद्देशिक्षण विभागाची माहिती८१ नव्या इमारतीचे प्रस्ताव दाखलकमी पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ८१ इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाºयांकडून प्रस्ताव आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात या विषयावर चर्चा झाली. बैठकीला शिक्षण सभापती शिवानंद पाटील, सदस्य मायाक्का यमगर, गोविंद जरे, संजय गायकवाड, रणजितसिंह शिंदे, स्वाती कांबळे उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक असलेल्या इमारती निर्लेखित करून पाडण्यासाठी दरवर्षी आढावा घेतला जातो. अशा १६४ इमारतींची माहिती यावर्षी पुढे आली आहे. या सर्व शाळांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाºयांकडून तत्काळ पाठविण्यात यावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यात ज्ञानरचनावाद कार्यक्रम राबविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सहा लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ५५०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २८२३० रोपे लावण्यात आली़ ही सर्व रोपे जगविण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी वेबसाईट तयार केली जाणार आहे. 
राज्यस्तरीय खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाºया शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी या वर्षापासून जिल्हा परिषदेकडून पुरस्कार दिले जाणार आहेत़ यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पाच लाख रूपयांची तरतूद केली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांच्या दैनिक उपस्थितीच्या नोंदीसाठी बायोमेट्रिक मशीनचा वापर केला जावा, यावरही चर्चा करण्यात आली. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अशा मशिन्स उपलब्ध आहेत. त्यावर शिक्षकांनीही नोंदी कराव्यात यादृष्टीने काय तांत्रिक सुधारणा करता येईल, या संदर्भात माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे ठरले आहे.
------------------------------
कमी पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन
च्जिल्ह्यात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३४ आणि २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १८९ शाळा आहेत. या सर्व शाळा एकशिक्षकी असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती नसली तरी शिक्षकांना शाळेत हजर राहावे लागते. त्यामुळे गरजेनुसार या शाळा बंद करून येथील शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याच्या दृष्टीने येत्या सात दिवसांत माहिती सादर करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. सांगोला, करमाळा, माळशिरस, अक्कलकोट या तालुक्यात अशा शाळांची संख्या अधिक आहे.