शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे दर भडकले

By admin | Updated: October 31, 2014 00:40 IST

पावसाचा दणका : सर्वसामान्यांसह विक्रेतेही बेजार

प्रसन्न राणे ल्ल सावंतवाडीगेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील बाजारातील भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र, मंगळवारपासून पावसाचे सावट दूर झाल्याने भाज्यांचे दर काही प्रमाणात उतरण्याची शक्यता विके्रत्यांनी वर्तविली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी भाज्यांचे दर वाढलेलेच दिसून येत आहेत. याचा फटका ग्राहकांबरोबरच भाजी विक्रेत्यांनाही बसत आहे. वाढती महागाई सर्वसामान्य जनतेला जगणे नकोसे करुन टाकत असतानाच परतीच्या पावसानेही महागाई वाढविण्यात हातभार लावलेला आहे. शेतकऱ्यांना यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे भाज्यांचे उत्पन्न चांगले मिळणार असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आकांक्षावर पाणी फेरले. गेल्या वर्षीच्या दरांच्या तुलनेत यावर्षी भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. याचा फटका भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास भाज्यांचे दर पुन्हा वाढण्याचीही शक्यता आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने वाढसन २०१३ चा विचार करता कोथिंबीर १० रुपये पेंडी, कोबी २० रुपये किलो, मिरची ३० रुपये किलो, गाजर ४० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, वाली ४० रुपये किलो, वांगी ३० रुपये किलो, ढबू मिरची ३० रुपये किलो, दुधी २० रुपये किलो तर लिंबू दहा रुपयांना पाच नग अशा किमती होत्या. २०१४ च्या पावसाळ्यात फरसबी ६० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, भेंडी ५० रुपये, वांगी ४० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ४० रुपये प्रती किलो व कोथिंबीर २० रुपये पेंडी झाली होती. श्रावण महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाज्यांचे दर वाढून फरसबी १२० रुपये, मिरची १२० रुपये, गाजर १२० रुपये, भेंडी ६० रुपये, वाली ६० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ५० रुपये प्रती किलो आणि कोेथिंबीर ४० रुपये पेंडी व लिंबू १० रुपये एक नग अशा पद्धतीने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली होती. ४अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेतील भाज्यांच्या किमतीमध्ये वाढ करावी लागली होती. ४याचा फटका सामान्य जनतेलाही बसला. यामुळे गेले काही दिवस भाज्यांचे दर गगनाला भिडले होते.४परंतु मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत भाज्यांच्या दरात घट होईल असे विक्रेत्यांना वाटत आहे. ४ दर वाढूनही भाज्यांची खरेदी-विक्रीची उलाढाल मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होती. ऐन श्रावण महिन्यातही भाजी दरवाढीमुळे नागरिकांना मोठा फटका बसला होता. पावसाचा हंगाम संपूनही पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने याचा परिणाम भाजी पिकांवर होऊन भाज्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परतीच्या पावसामुळे फरसबीच्या दराने १२० रुपयांचा अंक गाठला. इतर भाज्यांचे दरही वाढले होते. परंतु पावसाचे सावट दूर झाल्यानंतर हे दर पुन्हा एकदा खाली उतरले आहेत. यामध्ये फरसबी ६० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ४० रुपये, गाजर ६० रुपये, भेंडी ५० रुपये, वाल ४० रुपये, वांगी ४० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ४० रुपये प्रती किलो तसेच कोथिंबीर २० रुपये पेंडी व लिंबू १० रुपयांना तीन नग अशी भाज्यांच्या दरात घट झाली आहे.