शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : कबुलायतदार गावकर प्रश्नी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून प्रस्ताव द्या : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:29 IST

कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी एका महिन्यात शासनाला अहवाल द्या व या गावांचा फेरसर्व्हे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देग्रामस्थांचे म्हणणे ऐकून प्रस्ताव द्या : चंद्रकांत पाटीलकबुलायतदार गावकर प्रश्न; जिल्हाधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत

सावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आंबोली, चौकुळ, गेळे या भागातील कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असून, या संदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन एका महिन्यात शासनाला अहवाल द्या व या गावांचा फेरसर्व्हे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच ज्या जमिनीवर वन आहे, त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून देण्यात येईल, अशी माहितीही यावेळी मंत्री पाटील यांनी दिली.आंबोली, चौकुळ, गेळे या तीन गावात कबुलायतदार गावकर प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. तो प्रश्न सुटावा यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, अतुल काळसेकर, महेश सारंग, मनोज नाईक, दादू कविटकर, शशिकांत गावडे, उल्हास गावडे, गजानन पालयेकर, अंकुश कदम, राजू गावडे, तानाजी गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.कबुलायतदार गावकर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. हा प्रश्न सुटावा म्हणून प्रयत्न सुरू होते. पण त्याला एक दिशा मिळत नव्हती. अनेकवेळा बैठकाही झाल्या, पण नंतर काहीच झाले नाही. अखेर भाजपने पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढला जावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर याबाबत बैठक घेण्यात आली.यात महसूलमंत्री यांनी कबुलायतदार गावकर प्रश्न समजावून घेत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यात प्रामुख्याने जी वनजमीन आहे, त्याचा निर्णय शासन घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे वेगळे प्रस्ताव तयार करून ते केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार, असे स्पष्टपणे पाटील यांनी सांगितले.त्यानंतर ज्या जमिनी कबुलायतदारांच्या नावावर आहेत, त्यांचे वाटप शासन तत्काळ करू शकते. पण त्यासाठी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. याची सुनावणी जिल्हाधिकाºयांनी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली.सुनावणी घेऊन त्याचा अहवाल एका महिन्यात शासनाला द्या. त्यानंतर शासन निर्णय घेईल. तसेच या तीनही गावांचा फेरसर्व्हे करा, असेही महसूलमंत्री पाटील यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीला महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री दूरआंबोली, गेळे व चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्न पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात येत आहे. असे असतानाही महसूलमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला पालकमंत्री दीपक केसरकर यांना दूर ठेवण्यात आले. भाजपने आयोजित केलेली ही बैठक होती, असे मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी