शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर करडी नजर

By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST

स्वतंत्र समिती ठेवणार लक्ष, मीडियावरील मजकुराचा खर्चात समावेश

रत्नागिरी : सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा किंवा उमेदवारांचा प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने यावेळी चांगलाच चाप लावला आहे. त्याचबरोबर विरोधी उमेदवाराबाबतही काही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्यास त्यावरही आयोगाचा बडगा उगारला जाणार आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून त्याच्यामार्फत आता या सर्व सोशल साईटवर लक्ष ठेवले जाणार आहे.सध्या सर्वत्रच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर मदत झाली होती. या निवडणुकीतही व्हॉटस् अप, फेसबुक, द्वीटर, स्काईप आदी विविध सोशल साईटचा वापर होणार हे गृहीत धरून निवडणूक आयोगाने या निवडणुकीत सोशल साईटचा वापर करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इतर जिल्ह्यांप्रमाणेच जिल्ह्यात सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठीही स्वतंत्र पथक कार्यरत झाले आहे. आतापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा प्रयत्न झाल्यास तो पक्षाच्या खर्चात अंतर्भूत केला जाणार आहे. उमेदवाराने केलेली कामे तसेच काही आक्षेपार्ह मजकूर टाकला जात आहे का, यावरही नियंत्रण ठेवले जात आहे. यासाठी विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपयोगात आणले जात असल्याने या कंपन्यांकडूनही जिल्ह्यातील ग्राहकांची यादी घेतली जाणार असल्याने आक्षेपार्ह मजकूर नेमका कोठून टाकण्यात आला आहे, हे निष्पन्न होईल आणि एकदा ही बाब स्पष्ट झाली की असा मजकूर टाकणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.एकंदरीत या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी तसेच विरोधकांना नामोहरम करण्याकरिता होऊ शकेल, अशी गाजरे राजकीय मंडळी खुशीत खात होती. मात्र, आता आयोगानेच यावर बडगा उगारल्याने आता आनंदावर विरजण पडले आहे. एकंदरीत आता सोशल मीडियावर प्रचाराबरोबरच आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांना, त्यांना ‘लाईक’ वा ‘शेअर’ करणाऱ्यांवरही ही समिती वचक ठेवणार असल्याने आता या निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत या सोशल मीडियाचा वापर साऱ्यांनाच जपून करावा लागणार आहे. त्याप्रमाणे असा आक्षेपार्ह मजकूर कुणाला आढळून आल्यास त्यांनी निवडणुक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)