शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्या ! ;- शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:23 IST

त्यामुळे  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी  भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली  तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवली तहसीलदारांना निवेदन

 

कणकवली : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान  भरपाई राज्यपालांनी मंजूर केली आहे . मात्र , ही भरपाई आम्हाला मान्य नाही.  हेक्टरी ५० ते ६० हजार रुपये भरपाई द्यावी , अशी मागणी यापूर्वी आम्ही केली होती . त्यामुळे  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी  भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली  तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

       कणकवली तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने  सोमवारी तहसिलदार आर . जे . पवार यांची भेट घेऊन अवकाळी पाऊस नुकसाणीबाबत चर्चा केली.  तसेच मागण्यांबाबत  निवेदनही दिले . यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर , तालुकाप्रमुख शैलेश भोगले , प्रथमेश सावंत , संदेश पटेल , अॅड . हर्षद गावडे , महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम सावंत - पालव , उपजिल्हाप्रमुख राजू शेटये , सुजित जाधव , नगरसवक सुशांत नाईक , माहि परूळेकर , कन्हैया पारकर , प्रतिक्षा साटम , साक्षी आमडोसकर , राजू राठोड , राजू राणे , प्रसाद अंधारी , शेखर राणे , भालचंद्र दळवी . धनंजय सावंत , शरद वायंगणकर , रुपेश आमडोसकर , बंडू ठाकूर , अविनाश सापळे , उमेश घाडीगांवकर , दिलीप मर्ये , रिमेश चव्हाण , संजना कोलते , आनंद आचरेकर , प्रतिक्षा साटम , मिनल म्हसकर , विलास गुडेकर , जयबा कुरेशी , आनंद आचरेकर , सोमा गायकवाड , नासिर खान , अनुप वारंग , वाय . डी . सावंत यांच्यासहीत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

            यावेळी कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६०७२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे . त्याबाबत पंचनामे करून अहवाल गेला असून आतापर्यंत १ कोटी १५ लाख रुपये जमा झालेले आहेत . रक्कम तत्काळ वाटप करण्यात येत असल्याचे तहसिलदार पवार यांनी स्पष्ट केले .          शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रती हेक्टरी ५० ते ६० हजार खर्च येतो . मात्र , राज्यपालांनी ८ हजार रुपये हेक्टरी भरपाई जहिर केली . ती भरपाई तुटपुंजी आहे . शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तरी भरपाई मिळाली पाहिजे . तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचे प्रती हेक्टरी ६ हजार रुपये अद्याप जमा झालेले नाहीत . ही रक्कम त्वरीत जमा झाली पाहिजे . पिक विमा योजनेची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही . ती लवकरात लवकर मिळावी .

         बऱ्याच ठिकाणी शेतकरी कसत असलेले क्षेत्र हे देवस्थान इनाम किंवा कुळ अगर तोंडी कराराने कसत असतात . त्यामुळे भरपाईची रक्कम अदा करताना खात्री करण्यात यावी . खरीप हंगामामध्ये जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून जिल्ह्यात सुमारे ८० कोटी एवढी रक्कम पिक कर्ज म्हणून वाटप करण्यात आलेली आहे .

             या पिककर्जाचे मुद्दल व व्याज माफ करण्यात यावे . ज्या शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे . अशांच्या बाबतीत व्यक्तिगत पातळीवर पंचनामा  होऊन त्यांनाही योग्य ती भरपाई मिळावी . अतिवृष्टीमुळे गुरांसाठी असलेला  चारा कुजून गेला आहे . त्यामुळे पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी अनुदान वा चारा छावणी उभारण्यात यावी .

             तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीपुरक खावटी कर्ज घेतेलले आहे . या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ खाली कर्जमाफी जाहिर झाली असून त्यांचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही . त्यामुळे शेतकऱ्यांना नविन कर्ज घेता येत नाही व व्याजाचा बोजाही वाढत आहे .त्यामुळे खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली . शेतकरी सन्मान योजनेची रक्कम जिल्हा बँकेतील खात्यांमध्ये जमा होत नाही , ती होण्याच्यादृष्टीने कार्यवाहीची करण्यात यावी . अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

कणकवली तहसीलदार आर जे पवार यांना सोमवारी शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संदेश पारकर, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सुजित जाधव, नीलम सावंत- पालव , हर्षद गावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना