शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

इन्सुलीतील ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:52 PM

इन्सुली-डोबवाडी येथील डांबर प्लांटमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. संबंधित प्लांट मालक व ग्रामस्थांची ९ डिसेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्यात येईल.

ठळक मुद्देइन्सुलीतील ग्रामस्थांचे उपोषण स्थगित सनदशीर तोडगा न निघाल्यास उपोषण

सावंतवाडी : इन्सुली-डोबवाडी येथील डांबर प्लांटमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. संबंधित प्लांट मालक व ग्रामस्थांची ९ डिसेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्यात येईल.तसेच निर्णय होईपर्यंत प्लांट बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.इन्सुली-डोबाचीशेळ येथे गेल्या कित्येक वर्षांपासून डांबर प्लांट सुरू आहे. या प्लांटमुळे होणारे प्रदूषण आरोग्यास हानिकारक असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूलच्या प्रशासनाकडे केली होती. मात्र, कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री व आमदार दीपक केसरकर यांची भेट घेऊन उपोषणाला बसण्याबाबत निवेदन दिले होते. यावेळी ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सवाल निर्माण होत असल्यास कारवाई करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल तसेच याबाबत उपाययोजना म्हणून संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे शनिवारी ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सरपंच पूजा पेडणेकर, उपसरपंच सदा राणे, कृष्णा सावंत, स्वागत नाटेकर यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.सनदशीर तोडगा न निघाल्यास उपोषणतहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी उपोषणाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यामध्ये संबंधित प्लांट मालकाशी चर्चा करून ग्रामस्थ आणि प्लांट मालक यांची संयुक्त बैठक ९ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. तसेच निर्णय होईपर्यंत प्लांट बंद ठेवण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान, याबाबत सनदशीर तोडगा न निघाल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरण