शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

इन्सुलीतील ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:56 IST

इन्सुली-डोबवाडी येथील डांबर प्लांटमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. संबंधित प्लांट मालक व ग्रामस्थांची ९ डिसेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्यात येईल.

ठळक मुद्देइन्सुलीतील ग्रामस्थांचे उपोषण स्थगित सनदशीर तोडगा न निघाल्यास उपोषण

सावंतवाडी : इन्सुली-डोबवाडी येथील डांबर प्लांटमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. संबंधित प्लांट मालक व ग्रामस्थांची ९ डिसेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्यात येईल.
तसेच निर्णय होईपर्यंत प्लांट बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

इन्सुली-डोबाचीशेळ येथे गेल्या कित्येक वर्षांपासून डांबर प्लांट सुरू आहे. या प्लांटमुळे होणारे प्रदूषण आरोग्यास हानिकारक असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूलच्या प्रशासनाकडे केली होती. मात्र, कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री व आमदार दीपक केसरकर यांची भेट घेऊन उपोषणाला बसण्याबाबत निवेदन दिले होते. यावेळी ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सवाल निर्माण होत असल्यास कारवाई करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल तसेच याबाबत उपाययोजना म्हणून संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे शनिवारी ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सरपंच पूजा पेडणेकर, उपसरपंच सदा राणे, कृष्णा सावंत, स्वागत नाटेकर यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सनदशीर तोडगा न निघाल्यास उपोषण

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी उपोषणाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यामध्ये संबंधित प्लांट मालकाशी चर्चा करून ग्रामस्थ आणि प्लांट मालक यांची संयुक्त बैठक ९ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. तसेच निर्णय होईपर्यंत प्लांट बंद ठेवण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान, याबाबत सनदशीर तोडगा न निघाल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरण