शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
3
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
4
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
5
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
6
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
7
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
8
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
9
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
10
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
11
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
12
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
14
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
15
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
17
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
18
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
19
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
20
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
Daily Top 2Weekly Top 5

इन्सुलीतील ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:56 IST

इन्सुली-डोबवाडी येथील डांबर प्लांटमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. संबंधित प्लांट मालक व ग्रामस्थांची ९ डिसेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्यात येईल.

ठळक मुद्देइन्सुलीतील ग्रामस्थांचे उपोषण स्थगित सनदशीर तोडगा न निघाल्यास उपोषण

सावंतवाडी : इन्सुली-डोबवाडी येथील डांबर प्लांटमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. संबंधित प्लांट मालक व ग्रामस्थांची ९ डिसेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्यात येईल.
तसेच निर्णय होईपर्यंत प्लांट बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

इन्सुली-डोबाचीशेळ येथे गेल्या कित्येक वर्षांपासून डांबर प्लांट सुरू आहे. या प्लांटमुळे होणारे प्रदूषण आरोग्यास हानिकारक असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूलच्या प्रशासनाकडे केली होती. मात्र, कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री व आमदार दीपक केसरकर यांची भेट घेऊन उपोषणाला बसण्याबाबत निवेदन दिले होते. यावेळी ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सवाल निर्माण होत असल्यास कारवाई करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल तसेच याबाबत उपाययोजना म्हणून संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे शनिवारी ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सरपंच पूजा पेडणेकर, उपसरपंच सदा राणे, कृष्णा सावंत, स्वागत नाटेकर यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सनदशीर तोडगा न निघाल्यास उपोषण

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी उपोषणाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यामध्ये संबंधित प्लांट मालकाशी चर्चा करून ग्रामस्थ आणि प्लांट मालक यांची संयुक्त बैठक ९ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. तसेच निर्णय होईपर्यंत प्लांट बंद ठेवण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान, याबाबत सनदशीर तोडगा न निघाल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरण