शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:09 IST

गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली.

ठळक मुद्देक्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराासिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीतील काही मुद्दे बरोबर आहेत. सरपंच संघटना त्याचे समर्थन करते. गणेशोत्सवाला येणाºया चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली. तसेच गणेश आगमन ते विसर्जन कालावधीपर्यंत किमान १५ ते २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द करू नये. त्यातील सूचनांचा उपयोग याठिकाणी करण्यात यावा, अशी मागणी  येथे झालेल्या सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गणेश चतुर्थीचा महत्त्वाचा सण येत आहे. त्यासाठी गावात येणाऱ्याकरमान्यांबाबत निर्णय घेण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीला अनेक गावचे सरपंच उपस्थित होते. यात संजना सावंत, रुचिता सावंत, रेश्मा गावकर, वर्षा वरक, केशव जाधव, सुभाष सावंत, निधी नाईक, जयेश सावंत, सुप्रिया मडगावकर, डॉ. मनस्वी राऊळ, अपर्णा तळवणेकर, प्रतिभा गावडे, शीतल जोशी, स्नेहा मिठबांवकर, स्मिता मोरजकर, रेखा घावरे, उत्कर्षा गावकर, अक्षरा पाडलोसकर, अभिलाष देसाई, भरत मयेकर, केशव जाधव, शरद नाईक, अंकुश कदम, देवेंद्र सावंत, विजय वालावलकर, भिकाजी केणी, साक्षी तोरसकर, अक्षता आरोंदेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून सकारात्मक चर्चा घडवून आणली. यावेळी नाणोस सरपंच वासुदेव जोशी, माडखोल सरपंच संजय शिरसाट, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर दिनेश सावंत, वासुदेव मेस्त्री, गुंजन हिराप, शिवदत्त घोगळे, सुरेश राऊळ, रोशनी पारधी, पूजा पेडणेकर, दिनानाथ कसालकर आदींसह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौदा दिवस क्वारंटाईनबाबत केंद्र शासनाकडून आदेश आले आहेत. मात्र, त्यात नेमका बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे.त्या बदलाचा निर्णय सर्वच गावांना स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे.

गोव्यातून चोरट्या पद्धतीने बोटीतून येणाºयांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले. गोवा आणि परजिल्ह्यातून येणाºया वाहनचालकांना बाहेर क्वारंटाईनची सोय केली जावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पूजा, भजन आदी गोष्टींवर बंदीचा निर्णय

यावेळी सरपंच संघटनेच्यावतीने वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले. यात गणेश चतुर्थी काळात एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास, त्या घरापुरता कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात यावा. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य, माहेरवाशीण, जावई यांना प्रवेश तर अन्य बाहेरून येणाºया पाहुण्यांना बंदी घालण्यात यावी, अशी कडक भूमिका यावेळी घेण्यात आली. पूजा, भजन आदी गोष्टींवरसुद्धा बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारवारवरून पुरोहित (भटजी) येणार असतील तर अगोदर १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे आणि ती जबाबदारी संबंधित गावातील समितीने घ्यावी, अशी सरपंचांनी भूमिका मांडली.शासन निर्णय सर्वांना बंधनकारक : म्हात्रे

शासन पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांनी पाळावा. तालुक्यातील पुरोहित, मुख्याध्यापक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मी आणि गटविकास अधिकारी वेगवेगळ्या बैठकीत गणेश चतुर्थी सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करणार आहोत, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग