शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी न्यायव्यवस्थेपुढे तंट्यांचे आव्हान

By admin | Updated: November 25, 2014 00:31 IST

न्याय व्यवस्थेला गती मिळाली असली तरी महसूली तंट्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने समितीची डोकेदुखी वाढत आहे.

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -न्याय व्यवस्थेवरील दिवसेंदिवस वाढणारा भार आणि न्यायदानाला होणारा विलंब यामुळे लोकांमध्ये बंडखोरीची भावना जागृत होते. हे रोखण्यासाठी पर्यायी न्याय व्यवस्था उभारण्यासाठी राज्याचे तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. यामुळे न्याय व्यवस्थेला गती मिळाली असली तरी महसूली तंट्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने समितीची डोकेदुखी वाढत आहे.
प्राचीन काळी ग्रामीण भागात जात पंचायत होती. या पंचायतीचे रूप काळानुरूप बदलत गेले. मध्ययुगीन ब्रिटिश काळात राजवट येऊन या जात पंचायतीला बदलते स्वरूप मिळाले. १८१८ पर्यंत पंचपध्दत शास्त्रींमार्फत न्याय देण्याची प्रथा काही काळ होती. कालांतराने जात पंचायतीचे रूप काळानुसार बदलत गेले. १८२६ पासून न्यायदानासाठी पक्षकांराना वकिलांतर्फे न्याय मागता येऊ लागला. १८२७मध्ये एलिफिन्स्टन संहितेतील २७ कायद्यांचे एकत्रिकीकरण करून धर्मशास्त्र व नीतीशास्त्रावर आधारित न्यायदान पध्दत अमलात आली. १८५७मध्ये न्यायादानाची स्थापना होऊन न्यायव्यवस्था बळकट होत गेली.
समाजव्यवस्थेत माणूस जसजसा प्रगत होत गेला तसा तो ऐक्य गमावून बसला. स्वार्थी प्रवृत्तीमुळे कायद्याचा गैरफायदा घेऊ लागला. परिणामी प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली. ते कमी करण्यासाठी व गावाची शांततेतून समृध्दीकडे वाटचाल करण्याच्या उद्देशाने १५ आॅगस्ट २००७पासून तंटामुक्त गाव मोहीम सुरू झाली. न्यायदान प्रक्रियेत मध्यस्थी व समुपदेशनावर भर देणे आवश्यक झाले. लोकांना लवकरात लवकर व कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी पर्यायी न्याय व्यवस्थेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाकडून यापूर्वी काही पर्यायी न्यायव्यवस्था आली.
या मोहिमेच्या माध्यमातून २०१३-१४मध्ये १९६८ दिवाणी खटल्यांपैकी २१ खटले मिटले. महसूली ९८५ खटल्यांपैकी ७२, फौजदारी ३९२२ खटल्यांपैकी ७१८, इतर २१३ पैकी १०७ मिळून एकूण ७०८८पैकी ९१८ खटले मिटले आहेत. खटले मिटण्याची टक्केवारी १२.९५ इतकी आहे.
अनेक प्रकारच्या तंट्यांमुळे गावातील शांतता भंग होते. पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर आपापसातील वादामुळे खटले अधिक दिवस चालतात. अशा वादांचा निवाडा होताना वेळ लागतो. त्याचा विचार करून शासनाने कुठल्याही मुद्द्यावर वाद होण्यापूर्वीच दोन्ही पक्षकारांना एकत्र आणून त्यांच्यातील संघर्ष मिटविण्याचे अधिकार तंटामुक्त समित्यांना दिले आहेत. समित्या कुठेही वाद आढळून आला, तर वाद घालणाऱ्यांना तत्काळ भेटून वाद विवादाचे परिणाम काय? पैसा व वेळेचा कसा अपव्यय होतो? न्याय केव्हा मिळतो? याबाबत सविस्तर माहिती देऊन संघर्ष दूर करण्याचे काम करतात.
वादाचे गुन्ह्यात रूपांतर होणार नाही, याची काळजी घ्यायची व तो मिटवायचा. जेणेकरून नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्यांचे प्रमाण रोखता येईल, अशी शासनाची धारणा आहे. परंतु महसूली व दिवाणी तंट्यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय वर्षानुवर्षे चालणाऱ्या महसूली दाव्यामुळे आपापसातील संघर्ष वाढतो. फौजदारी दावे सोडवण्यात येणाऱ्या यशाएवढे यश महसूली, दिवाणी दावे सोडविण्यात येत नसल्यामुळे समित्यांची डोकेदुखी वाढली आहे.