शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

अवघी फलटणनगरी विठ्ठलमय..!

By admin | Updated: July 2, 2014 00:26 IST

वारकऱ्यांची आर्त हाक : ईडा-पीडा टळू दे, पाऊस पडू दे!

किरण बोळे ल्ल कोळकी पंढरीसी जाय, तो विसरे मायबाप अवघा होय पांडुरंग, राहे धरुनिया अंग न लगे धन मान, देहभान उदासीन तुका म्हणे मळ, नासी तत्काळ ते स्थळ जगद्गुरू तुकोबारायांच्या संदेशानुसार फलटण मुक्कामी विसावलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक नागरिक आपल्या परीने प्रयत्नशील होता. दरम्यान, राज्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने पालखी सोहळ्यातील यंदा वारकऱ्यांची गतवर्षीच्या तुलनेत संख्या कमी असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ईडा-पीडा टळू दे, पाऊस पडू दे, अशी आर्त हाक भक्तांनी यावेळी माउलींना दिली. यंदा सर्वत्र पावसाने हुलकावणी दिल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे वारीत दरवर्षी सहभागी होणारे वारकरी यंदा मात्र वारीस आले नाहीत. दरम्यान, दोन दिवसांच्या कालावधीत फलटण शहरात असलेल्या पालखी वास्तव्याने शहरात सर्वत्र उत्सव आनंदाचा चैतन्याचा, स्फूर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा असे वातावरण होत. मंगळवारी दिवसभर शहर व परिसरात विविध सेवाभावी, सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्या वतीने ठिकठिकाणी अल्पोपहार देण्यात आला. विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी फलटणनगरी दुमदुमून गेली आहे. दरम्यान, बुधवार, दि. २ रोजी सकाळी साडेसहा वाजता फलटण येथून माउलींचे प्रस्थान होणार असून न्याहरी विडणी येथे, दुपारचे जेवण व नैवेद्य पिंप्रद येथे असू सायंकाळी सहा वाजता बरड येथे पालखी विसावणार आहे.