शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जखिणवाडीला चार वर्षांत बारा पारितोषिके स्वच्छतेत सातत्य : राज्य स्पर्धेत धडक

By admin | Updated: November 23, 2014 23:44 IST

‘स्वच्छ भारत’ अभियान उत्स्फूर्तपणे

मलकापूर : जखिणवाडी ग्रामस्थांनी महिन्यातील पहिला मंगळवार गावच्या स्वच्छतेसाठी हा अभिनव उपक्रम गेली चार वर्षे सुरू आहे़ स्वच्छतेबाबत सातत्य राखल्यानेच शासनाचे बारा पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत़ तालुक्यातील इतर गावांसाठी त्यांचा उपक्रम प्रेरणादायी आहे़ जखिणवाडी, ता़ कऱ्हाड येथे चार वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी सरपंच नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या हाती गावाचा कारभार सोपविला़ सदस्यांनी गावात एक-एक करत नवनवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली़ गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणून स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत घेण्यात आला़ त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी दर महिन्यातील पहिला मंगळवार गावाच्या स्वच्छतेसाठी देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी संमती दिली़ हा अभिनव उपक्रम गेली चार वर्षे सुरू आहे़ (प्रतिनिधी)
राज्य शासनाची तब्बल बारा पारितोषिके जखिणवाडीने पटकावली आहेत़ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला, तर विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावित राज्यस्तरीय स्वच्छता अभियान स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला आहे़
यशाची शिखरे गाठणाऱ्या गावाचा आदर्श राज्यातील इतर गावांनी घ्यावा़ यासाठी शसनाच्या वतीने जखिणवाडीचा मॉडेल म्हणून उपयोग केला जात आहे़ (प्रतिनिधी)


जखिणवाडीला डझनभर पुरस्कार
जखिणवाडी गावाने २००९-१० वर्षात ‘निर्मलग्राम’, २०१०-११ या वर्षात सदाशिव खांडके यांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार, २०११-१२ या वर्षात ‘पर्यावरण समृद्ध गाव’, संत गाडगबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम, दिवंगत वसंतराव नाईक पाणी व ‘सांडपाणी व्यवस्थापन’ पुरस्कार व यशवंत पंचायत राज तालुक्यात प्रथम हे पाच पुरस्कार, २०१२-१३ यावर्षी गौरव ग्रामसभेस मानांकन व विकासरत्न पुरस्कार, २०१३-१४ वर्षात संतत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम व पुणे विभागात द्वितीय दोन पुरस्कार तर २०१४-१५ या वर्षात यशवंत पंचायत राज जिल्ह्यात प्रथम क्रमांक असे बारा पुरस्कार मिळवले़

‘स्वच्छ भारत’ अभियान उत्स्फूर्तपणे
जखिणवाडी गावातील ‘स्वच्छ भारत’ अभियानात प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, अविनाश फडतरे, सदाशिव खांडके, चंद्रकांत पारवे, नागेश निकम, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच पांडुरंग कणसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादाराम पाटील, मारुती नलावडे यांच्यासह सर्वांनी सहभाग घेतला़