शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ केलेला विकास शाश्वत नाही--

By admin | Updated: January 2, 2015 00:23 IST

‘पृथ्वीराज चव्हाण सर्वांत निष्क्रिय मुख्यमंत्री’: विलासराव उंडाळकर

 कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणाला नैतिक अधिष्ठान नसल्याचा आरोप
कऱ्हाड : ‘आगामी ५० वर्षांचा विचार करून कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाला आपण विकासाचे रोल मॉडेल बनविले. या मतदारसंघात नव्या आमदारांना गटारे अन् गल्लीबोळातील रस्ते वगळता करण्यासारखे काही विकासकामे ठेवलेले नाही. चव्हाण हे चार वर्षे मुख्यमंत्री होते. मात्र, नैतिक अधिष्ठान नसल्याने व दलालामार्फत राजकारण केल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी शाश्वत असे काहीही करू शकले नाहीत,’ अशी टीका माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केली.
नांदलापूर येथे आभार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अशोकराव थोरात, प्रा. धनाजी काटकर, अ‍ॅड. अशोक मोहिते, कऱ्हाड तालुका सहकारी खरेदीविक्री संघाचे संचालक शेखर शिर्के, विश्वास निकम, सरपंच विलास शिर्के, उपसरपंच सुरेश शिंंदे, पांडुरंग बोंद्रे, दिग्गू मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशोकराव थोरात म्हणाले, ‘संधीसाधू राजकारण लोकांसाठी संकट ठरते. कराडमधील शंभर फुटी रस्त्याचा प्रश्न असो, अथवा मलकापुरातील वाढीव घरपट्टी हे प्रश्न संधीसाधू राजकारणामुळेच वाढले. घरपट्टीवाढी संदर्भातील सुनावणीलाही लोकांचे म्हणणे ऐकून न घेता मनमानी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
धनाजी काटकर, विश्वास निकम यांनी मनोगत व्यक्त केले. शेखर शिर्के यांनी प्रास्ताविक केले. जयवंत शिर्के यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

‘पृथ्वीराज चव्हाण सर्वांत निष्क्रिय मुख्यमंत्री’
उंडाळकर म्हणाले, ‘दक्षिणेत माझा पराभव झाला; पण मी पराभवाने खचलेलो नाही. मात्र, कोणत्या प्रवृत्तीचा विजय झाला व तो कसा झाला, याबाबत येथील जनतेमध्ये प्रबोधन झाले पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. चार वर्षांची सत्ता त्यांनी राजकीय जिरवाजिरवीसाठी वापरली. इतर पक्षांना संपवताना स्वत:चा पक्षही संपविला. लाचारांची फौज घेऊन फार काळ राजकारण करता येत नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी राजकारणात सजग राहिले पाहिजे.’