शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

झेंडूच्या फुलांना केराची टोपली, दसऱ्यापूर्वीच बहरल्यामुळे दर गडगडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:41 IST

रस्त्यावरच ढीग; कॅरेट थेट कचरागाडीत

माणिक डोंगरेमलकापूर : वातावरणातील बदलामुळे व पाऊस कमी आणि उष्णता वाढल्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्ताच्या अगोदरच बहरल्यामुळे झेंडूच्या फुलांचे दर गडगडले आहेत. किलोला २० रुपये दर मिळत नसल्याने रस्त्यावर ढीग लागले. नाईलाजास्तव क्रेट थेट कचरागाडीत टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रस्त्यावर टाकलेले फुलांचे ढीग जेसीबीने गोळा करत झेंडूच्या फुलांना मुंबई मार्केटमध्ये थेट कचरागाडीची वाट दाखवली आहे.मलकापुरातील शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच्या पिकांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला व फुलशेतीसह इतर पिकाकडे वळले आहेत. यावर्षी झेंडू उत्पादक शेजाऱ्यांना कमी पाऊस असल्यामुळे झेंडूच्या बागा जोपासणे सोपे झाले होते. फुलांना दसऱ्याला दर मिळेल व उत्पन्न वाढेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी झेंडूच्या रोपांची लागवण केली. माल बाजारात नेण्यापर्यंतच्या खर्चाचा विचार करता फुलांना दरवर्षी जेमतेम २० ते ८० रुपये प्रती किलो दर मिळत होता. दसरा दिवाळीला तर ग्राहक मिळवतानाही ओरडून घसा कोरडा करावा लागत होता. मात्र यावेळी पाऊस प्रमाणात असल्यामुळे फुलशेती चांगलीच बाहरली होती.

दसऱ्याऐवजी काही दिवस अगोदरच फुले विक्रीयोग्य झाली. फुलाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत उठाव होत नव्हता. शेतकऱ्यांना पुणे, मुंबईसह बेंगळुरूसारख्या मोठ्या बाजारपेठेत धाव घ्यावी लागली. फुले दसऱ्यापर्यंत टिकवणे कठीण झाले होते. परिणामी शेतकऱ्यांना लवकरच फुले तोडून बाजारात घेऊन जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत वाहने भरून गेले असता फुले घेण्यासाठी ग्राहकच मिळेना.दरवर्षी शेतकऱ्यांच्या फुलांना घाऊक बाजारात किलोला ५० ते ६० रुपये दर मिळत असे. मात्र यावर्षी २० रुपये सुद्धा दर देण्यास कोणी तयार होत नाही. एक-दोन दिवसातच फुले खराब झाल्याने क्रेट थेट कचरागाडीतच ओतावे लागले. तर काही शेतकऱ्यांनी बाजारतळातच फुलाचे ढीग आहे, तसेच सोडून यावे लागले. संबंधित बाजार समिती प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने फुलाचे ढीग कचरा गाडीत भरले. अशा अवस्थेमुळे फुलशेती उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक व उत्पादन खर्चही न आल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांच्या बागा केल्या. पावसाने उघडीप दिली. दसऱ्याला फुले विक्रीयोग्य होतील, असे वाटत होते. मात्र वातावरणातील बदलामुळे लवकर फुले विक्रीयोग्य झाली. त्यामुळे फुलांची आवक वाढली. मुंबईच्या मार्केटमध्ये दर मिळेल या आशेने गेलो. मात्र तेथेही निराशाच झाली. अनेक शेतकऱ्यांना फुले कचऱ्यात टाकावी लागली. - अशोकराव पाचुंदकर, झेंडू उत्पादक शेतकरी. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर