शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची भूमिका पार पाडतायत शिक्षक

By admin | Updated: March 20, 2016 23:50 IST

महामार्ग ओलांडण्यासाठी मदत : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियंत्रणाचे काम

भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे भुर्इंज परिसरात मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना अक्षरश: जीव मुठीत धरुन कसरत करावी लागत असल्याने येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षकच स्वत:चा वेळ खर्ची करुन नियमितपणे वाहतूक नियंत्रणाचे काम अव्याहतपणे करत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय अगदी महामार्गालगतच व गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. या विद्यालयात सुमारे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेसाठी महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. शाळेच्या वेळेत महामार्गालगत विद्यार्थ्यांची अक्षरश: झुंबड उडत आहे. शाळेच्या वेळेत महामार्गावर एकही वाहतूक पोलिस आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही. किंंबहुना रस्ता वाहतूक सुरक्षा हा विषयच संबंधित पोलिस विभागाच्या डायरीत नाही काय, असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती आहे. मात्र येथील शिक्षकांनी पोलिसांच्या या असहकाराबाबत ओरड करण्याऐवजी पोलिसांची भूमिका स्वत:च बजावण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी दररोज ४ शिक्षक आपला वेळ खर्ची करुन रस्ता वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहेत. दोन्ही बाजूची वाहने थांबवून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यास या शिक्षकांची होत असलेली मदत म्हणजे एक प्रकारची विद्यार्थीसेवाच आहे. प्रत्येक ५ ते १० मिनिटांनी ठराविक संख्येने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी दोन्ही बाजूच्या रस्त्यावर शिक्षक थांबलेले असतात. अनेकदा काही वाहनचालक या शिक्षकांना जुमानत नाहीत, मात्र तरीही हे शिक्षक त्याची पर्वा न करता आपल्या कर्तव्याशी इमान राखत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत. त्यासाठी सर्व शिक्षकांनी या सेवेसाठी दिवस वाटून घेतले असून घरी लवकर जाण्याची घाई न करता त्यांच्याकडून सुरु असलेल्या या कामाबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी) पोलिसांनी इकडेही पहावेविद्यार्थ्यांसह सर्वच पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता आला पाहिजे. नागरिक म्हणून रस्ता सुरक्षासेवा हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्यादृष्टीने हे काम वाहतूक पोलिसांचे असून ते मात्र भलत्याच कामात दंग असतात. त्यामुळे शिक्षकांचीही सेवा पाहून पोलिसांनी शाळा सुटण्याच्या वेळेत महामार्गावर आपले कर्तव्य बजवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.