शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांपुढे टाहो!

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

खटाव तालुका : होळीचा गाव, गुरसाळे, शिरसवडे, शितोळेवाडी ग्रामस्थांनी मांडली व्यथा

सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांना बळ देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा एकसूत्री कार्यक्रम प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. खटाव तालुक्यात उरमोडीचे पाणी गेले असले तरी होळीचा गाव, गुरसाळे, शिरसवडे, शितोळेवाडी या गावांना डावलून पाणी पुढे पळविण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या या चार गावांतील शेतकऱ्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापुढे सोमवारी अक्षरश: टाहो फोडला. उरमोडी धरणातून खटावकडे नेलेले पाणी शिरसवडे येथील तलावात एकत्र केले जाते. या पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून वर्गणीही घेतली आहे. शेतकऱ्यांनी एक लाखाची वर्गणी उरमोडी धरण विभागाला भरली असून, त्याची रितसर पावतीही शेतकऱ्यांकडे आहे. दुष्काळी भागात मोडत असूनही या भागातील शेतकऱ्यांनी हंगामी पिकांसोबत कांदा, बटाटा अशी नगदी पिकेही केली आहेत. शिरसवडे तलावात पाणी नसल्याने जवळपास ५० हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. उरमोडी विभागाशी वारंवार संपर्क साधूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या गावांतील प्रताप जाधव, वसंत देशमुख, मनोज शितोळे यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्र्यांची भेट घेतली. चार गावांना डावलून पाणी नेल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. पुढच्या गावांना पाणी नेले असले तरी पाठीमागच्या गावांना पाणी दिले गेले नाही. या गावांची गळचेपी केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. त्यावर पिण्याचे पाणी प्रामुख्याने देण्यात येत असल्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्टीकरण केले; पण वडूज, उंबर्डे, नायकाचीवाडी या गावांत शेतीसाठीही पाणी दिले जात असून, हा नियम आम्हालाच का लावला आहे?, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला, त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. (प्रतिनिधी) लेखी निवेदन नसल्याने या प्रश्नाचं होणार काय? लेखी निवेदन दिल्याशिवाय कामे होत नाहीत, ही प्रशासकीय पद्धत दुष्काळ भागातल्या शेतकऱ्यांना माहीत नव्हती, त्यामुळे या शेतकऱ्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी तोंडी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला तशा सूचनाही केल्या; पण आता लेखी निवेदनाशिवाय प्रशासकीय यंत्रणा कितपत हालचाल करतेय, ते या प्रकरणात पाहण्याजोगे ठरणार आहे.