शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

जोराचा पाऊस येताच पूल पाण्याखाली... १०५ गावे संपर्कहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

पेट्री : सातारा - बामणोली रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असून, दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नसल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक ...

पेट्री : सातारा - बामणोली रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असून, दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नसल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. परिसरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. बुधवारी पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. दरवर्षी तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर अतिवृष्टीमुळे बऱ्याचवेळा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत होते. कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांना या समस्येला सामोरे जावे लागत असून, बुधवारी सायंकाळपासून पूल पाण्याखाली गेल्याने १०५ गावे संपर्कहीन झाली आहेत.

तलावाच्या दक्षिणेला धोकादायक वळणावरील पुलाच्या दक्षिणोत्तर बाजूला रक्षक दगड असून, दोन्ही बाजूला संरक्षक कठड्यांचा अभाव आहे. पुलाची उंची चार-पाच फूट असल्याने कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या पावसात दरवर्षी पुलावरून तीन-चार फुटांवरून पाणी वेगाने वाहते. ३५ ते ४० फूट लांबीपर्यंत पूल पाण्याखाली जातो. अरूंद रस्त्याचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणची धोकादायक परिस्थिती पाहता, पुलावरून पाणी वाहताना दळणवळण, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.

यंदा जून महिन्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला. काही दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा मुसळधार बरसण्यास सुरुवात केली. या पावसामुळे बुधवारी कास पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून वाहतूक ठप्प झाली. या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे व कास तलावाच्या दक्षिणेकडील पुलाची उंची कमी असल्याने मुसळधार पावसात कास तलाव पूर्णपणे वाहू लागला की, हा पूल पाण्याखाली दिसेनासा होऊन वाहतूक ठप्प होते. या मार्गावरून जाणाऱ्यांची गैरसोय होऊन नोकरदारवर्गाची तारांबळ उडते.

कासच्या पुलावरून पाणी वाहताच पलीकडील वाहने पलीकडे, अलीकडील वाहने अलीकडे अडकून पडतात. अनेकदा पश्चिम भागातील गावांचा संपर्क तुटतो. पूल पाण्याखाली गेल्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन पाणी कमी होण्यासाठी तीन-चार तास थांबावे लागल्याने वाहतूक ठप्प होते. पावसाचा जोर कायम असल्याने तसेच पाईपमध्ये गाळ, लाकडं अडकून पडल्याने बुधवारपासून पुलावरून पाणी वाहू लागले आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास भविष्यातील दुर्दैवी प्रसंग टाळले जातील.

चौकट

पूल पाण्याखाली जाताच पाण्याचा वेग प्रचंड असतो.

रक्षक दगडावरून पाणी वाहताना पूल ओलांडू नये, असा दर्शनी फलक पूर्णतः गंजला असून, नवीन फलक बसविणे आवश्यक आहे. पुलाची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ, नोकरदारवर्ग, वाहनचालंकाकडून होत आहे. प्रशासनाने लोकांच्या गैरसोयीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

कोट

बऱ्याचदा हुल्लडबाजी, स्टंटबाजी करणारे बेभरवशावर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून वाहने पलीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. यातून मोठ्या अपघाताची शक्यता आहे. तातडीने वैदयकीय सेवा भासल्यास वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.

- विष्णू किर्दत, माजी अध्यक्ष, कास संयुक्त व्यवस्थापन समिती

काल सायंकाळपासून सद्यस्थितीत पुलावरून अद्याप पाणी वाहत आहे. (छाया - सागर चव्हाण )