शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

माउलींच्या पादुकांचा नीरा स्नानाचा थाटच न्यारा!, लाखो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा क्षण अनुभवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:40 IST

चांदोबाचा लिंब येथे उद्या उभे रिंगण

नसीर शिकलगारफलटण :नीरा भिवरी पडता दृष्टी,स्नान करिता सुद्ध सृष्टी।अंती तो वैकुंठ प्राप्ती,ऐसे परमेष्टी बोलिल...अशा अभंगाच्या ओवी आळवित वारकऱ्यांनी लाखो वारकऱ्यांनी नीरा स्नानाचा क्षण याची देही याची डोळा अनुभवला. प्रथेप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होत असताना रविवारी नीरा स्नान पार पडत पडला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांनी माउली माउलीचा गजर केला.ऐतिहासिक ,सामाजिक व क्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेल्या तसेच गुरू हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला. या जिल्ह्यात माउलींच्या पालखीचा थाठ आणखी वाढणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा यंदा पाच दिवस मुक्काम आहे. यावर्षी फलटण येथील एक मुक्काम कमी झालेला आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर नीरा नदीवर माउलींच्या पादुकांना स्नान घालण्याचा दिव्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.श्री हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळचे होते. श्रीमंत महादजी शिंदे यांच्या दरबारात ते सरदार होते. संत ज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त असलेल्या हैबतबाबानी १८३२ मध्ये माउलींचा पालखी सोहळा सुरू केला. त्यांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार हे सोहळ्याचे मालक आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली सोहळा चालतो. त्याकाळी या सोहळ्याला श्रीमंत शितोळे सरकार तसेच इतरांनी मोठे सहकार्य केले होते. पालखी सोहळ्याचे महत्त्वही त्या काळात वाढविण्यासाठी अनेकांनी योगदान दिले होते. ती परंपरा आजही चालू आहे. पालखी सोहळा प्रस्थान करत असताना आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान माउलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर यांच्या स्वाधीन करते.आळंदी ते पंढरपूर व परत आळंदीला माघारी येईपर्यंत त्या त्यांच्या ताब्यात असतात. स्वतः आरफळकर वारीसोबत असतात. ज्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू केला. त्यांच्या जिल्ह्यात माउलींचे आगमन होताना अनेकांना भरून आले होते. माउलींचे स्वागत करण्यासाठी प्रशासन, राजकीय नेते मंडळी असतातच, पण जिल्ह्यातील अनेक भाविक पण स्वागतासाठी स्वतःहून उपस्थित होते.

चांदोबाचा लिंब येथे उद्या उभे रिंगणलोणंदमध्ये दोन दिवसांसाठी पालखी सोहळा विसावला आहे. मंगळवार, दि. २० रोजी सोहळा फलटण तालुक्यात प्रवेश करणार आहे. दुपारी चांदोबाचा लिंब येथे पालखी मार्गावरील ऐतिहासिक उभे रिंगण पार पडणार आहे. त्यानंतर सोहळा तरडगाव येथील पालखी तळावर मुक्कामासाठी विसावणार आहे.

बुधवार, दि. २१ रोजी ऐतिहासिक आणि प्राचीन फलटणनगरीत सोहळा मुक्कामासाठी विसावणार आहे. आळंदी ते पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील फलटण हे महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथून पंढरपूरला पायी जाण्यासाठी आणखी भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे सोहळ्यात गर्दी आणखी वाढते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी