शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

साप-पिंपरी फाटा चौक अपघाताचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा येथील चौक अपघाताचे केंद्र बनले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा येथील चौक अपघाताचे केंद्र बनले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन वाहनधारक जायबंदी झाले आहेत.

रहिमतपूर-औंध रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. तेव्हापासून या मार्गावरून ये-जा करणारी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. सध्या ऊसतोडणीचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर उसाने भरलेल्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. रहिमतपूर बसस्थानकापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर साप व पिंपरी फाटा आहे. या चौकामध्ये रहिमतपूरकडून औंधकडे जाणारी वाहने, औंधकडून रहिमतपूरकडे येणारी वाहने तसेच साप व पिंपरीमधून रहिमतपूर व औंधकडे जाणारी वाहने अशी वाहनांची वर्दळ दररोज असते. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे विचित्र पद्धतीने अपघात झाले आहेत. अनेक वाहनधारक यामध्ये गंभीर जखमी झाले असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने इकडे-तिकडे न पाहता बेशिस्तपणे चौकामध्ये अचानक येणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढू लागले आहेत.

पवारवाडी गावाच्या हद्दीत गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी व ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला होता. साप व पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर्शनी भागात गावांच्या नावांचे सूचनाफलक लावलेले नसल्यामुळे रहिमतपूर व औंधकडून येणाऱ्या वाहनचालकांना याठिकाणी गावाकडे जाणारे रस्ते असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाहने वेगाने ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक लावल्यास वाहनचालक योग्य ती वेगमर्यादा ठेवूनच गाडी चालवेल. त्यामुळे सूचनाफलक तातडीने लावावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

(चोैकट)

बेफाम गाडीचालकावर कारवाई करा

साप-पिंपरी फाट्यासह रहिमतपूर-पिंपरी फाटा या दरम्यानच्या रस्त्यावरही बेफाम वाहनचालकांमुळे मोठी वाहने पलटी होत आहेत. सुमारे दीड महिन्यापूर्वी जनावरांचा चारा घेऊन निघालेला टेम्पो दुचाकी आडवी आल्याने कॅनॉलजवळ पलटी झाला होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. असे विदारक अपघात टाळण्यासाठी बेफाम गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

०८रहिमतपूर

फोटो : रहिमतपूर-औंध रस्त्यावरील साप-पिंपरी फाटा हा चौक अपघातांचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. (छाया : जयदीप जाधव)