शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST

कुडाळ : महागाईने यावर्षी उच्चांक गाठला आहे. यातच दिवाळीपासून स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीने महागाईच्या भडक्यात आणखीच भर घातली. गेल्या चार ...

कुडाळ : महागाईने यावर्षी उच्चांक गाठला आहे. यातच दिवाळीपासून स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीने महागाईच्या भडक्यात आणखीच भर घातली. गेल्या चार महिन्यात गॅसच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ झाली असून, किराण्याबरोबरच भाजीपाल्याचेही दर भडकले आहेत. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे.

कोरोनाच्या काळात यावर्षी अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. मिळेल तो रोजगार करून सर्वसामान्य आपला उदरनिर्वाह करू लागला. अशातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या. टप्प्याटप्प्याने अनलॉक झाल्यानंतर विस्कटलेली व्यवसायाची घडी हळूहळू रुळावर यायला लागली. यामुळे महागाई कमी होईल, अशी सर्वांनाच आशा होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शासनाकडून मिळणारी सबसिडीही बंद झाली आहे.

ग्रामीण भागात शासनाच्यावतीने उज्ज्वला योजनेतून अनेक लाभार्थींना गॅस कनेक्शन दिले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या घरातही स्वयंपाकासाठी गॅस पेटत होता. महिलांचा धुरापासून बचाव व्हावा, वृक्षतोड थांबावी, यासाठी सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमती वाढत असून, सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. एका सिलिंडरसाठी तब्बल ८०० रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना गॅस खरेदी करणे परवडत नाही.

यामुळे गॅसची शेगडी गुंडाळून ठेवत ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. आता स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात चुली पेटू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

(चौकट)

एक डिसेंबरपासून ते आजपर्यंत दर आठवड्याला स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ झालेली आहे. डिसेंबर महिन्यात ५९४ रुपयांना मिळणारा गॅस आज ८०० रुपयांवर पोहोचला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत गॅस दरात तब्बल २०० रुपये इतकी प्रचंड वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात वाढत्या महागाईच्या झळा ग्रामीण भागातील सामान्य जनतेला अधिक प्रमाणात पोहोचत आहेत.

(कोट)

गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे गॅस खरेदी करू शकत नाही. वाढत्या महागाईमुळे आमचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गेली कित्येक दिवस बंद केलेल्या चुली आता पुन्हा पेटवण्याची वेळ आली आहे. धुराचा त्रास सहन करीत आमच्या डोळ्यांत गॅस दर वाढीने पाणी येत आहे. याकरिता सर्वसामान्यांचा विचार करून शासनाने घरगुती गॅसच्या किमती आवाक्यात ठेवाव्यात.

-रेश्मा पवार, गृहिणी