शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के असे गुणदान विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. अकरावीकडे बहुतांश विद्यार्थ्यांनी रेस्ट इयर म्हणून बघितल्याने यंदा विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शिक्षक मात्र विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचा सल्ला देत आहेत.

बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाच्या दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा आमच्या गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. या फॉर्म्युल्यानुसार अकरावी विद्यार्थ्यांचा घात करेल असे त्यांना वाटते आहे. शैक्षणिक तज्ज्ञांच्या मतेही विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात, पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांची यामुळे अडचण होणार आहे, विद्यार्थ्यांत भीती आहे, पण अकरावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळजी न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

कोट

शिक्षक काय म्हणतात

फॉर्म्युल्यानुसार दहावीतील बेस्ट ऑफ ३ ची सरासरी घ्यायला सांगितली. त्यानुसार दहावीत ज्या मुलाला ६० टक्के असेल आणि ३ विषयांत चांगले गुण असतील, तर त्याच्या गुणांच्या सरासरी आधारावर बारावीचे मूल्यांकन करायचे आहे. त्यामुळे बारावीत विद्यार्थ्यांचे गुण कमी न होता वाढणार आहेत.

- विशाल ढाणे, खासगी क्लास चालक.

बहुतांश विद्यार्थी अकरावीला रेस्ट म्हणून बघतात, पण कोरोनाने विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. मंडळाने दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार अकरावीच्या गुणालाही महत्त्व आले आहे. विद्यार्थी नापास होणार नाही, पण अकरावीच्या गुणांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर काहीसा परिणाम होईल.

- प्रा. डॉ. चंद्रकांत माने, पाटण.

विद्यार्थी काय म्हणतात

आमच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीची तयारी सुरू होते. त्यासाठी नाही म्हटलं तरी अकरावीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा परिणाम गुणांवरही होतो, पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो, अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे, पण बोर्डाने दिलेल्या फॉर्म्युलामुळे आमचे नुकसान होणार अशी भीती वाटते.

-

कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. हे विद्यार्थीहिताचे आहे. दहावीला चांगले गुण होते. मात्र, अकरावीकडे बारावीच्या तयारीत दुर्लक्ष केले. दहावीच्या गुणांना थोडे अधिक महत्त्व देत त्याचे ५० टक्के गुण घेणे आवश्यक होते. त्यामुळे टक्केवारी घसरण्याची भीती राहिली नसती, पण सीईटीची संधी असल्याने पुढील परीक्षांच्या अभ्यासाची तयारी करणे आमच्या हातात आहे, ते आम्ही करू.

-

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी

सीबीएसई -

मुले :

मुली :

स्टेट बोर्ड

मुले :

मुली :