शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
3
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
4
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
5
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
6
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
7
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
8
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
9
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
10
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
11
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
12
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
13
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
14
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
15
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
16
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
17
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
18
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
19
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
20
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
Daily Top 2Weekly Top 5

Raju Shetty: शरद पवार उसावर प्रक्रिया करणाऱ्यांनाच डोळ्यासमोर ठेवतात, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 17:57 IST

एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही.

कऱ्हाड : ‘किमान समान कार्यक्रमावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता; मात्र एकत्र येऊनही हे लोक सुधारत नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडलो आहे. शरद पवार तर ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजेंद्र गुड्डीनवार, कऱ्हाड दक्षिण स्वाभिमानीचे अध्यक्ष देवानंद पाटील, उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे यांची उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ एप्रिलपासून देवराष्ट्रेपासून राज्यात बळीराजा हुंकार यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांचे प्रश्न राजकारणापलीकडे जाऊन ऐरणीवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच प्रत्येक गावांमधील ग्रामसभेत शेतीला दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे. शेतमालाला हमीभाव केंद्राने मंजूर करावा अशा आशयाचे दोन ठराव करून घेत आहोत.’

‘निसर्गातील सहा घटकांपासून वीज तयार होते; मात्र विजेचे वाटप करताना शेतकऱ्यांना आठ तास आणि इतरांना चोवीस तास हे गणित चुकीचे आहे. शेतकऱ्यांशी सरकार क्रुरतेने वागत आहे. म्हणूनच याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. त्यासाठी ग्रामसभेमधील ठराव आम्हाला फायदेशीर ठरतील. गेल्या पाच वर्षांत सर्पदंशाने, जंगली श्वापदांच्या हल्ल्याने, वीज स्पर्शाने मृत्यू किती झाले आहेत याची माहिती सध्या संकलित करीत आहे. या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी करणार आहोत,’ असेही शेट्टी म्हणाले.

एफआरपीशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही

एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात राज्य सरकारला बदल करण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवार